शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: September 29, 2015 01:09 IST

बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला.

मोखाडा : बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला. परंतु, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे या आदिवासीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केला जात आहे.सोन्या राघो घाटाळ यांना सर्पदंश झाल्याने दुपारी उपचारासाठी आरोग्य पथक आडोशी या ठिकाणी नेण्यात आले होते. परंतु, तेथे सर्पदंशाच्या इलाजावर कोणती उपचार व्यवस्था नसल्याने तसेच येथील रुग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहनांची व्यवस्था करून खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांकडून या पेशंटवर प्रभावीपणे उपचार करण्यात आले नाही. फक्त सलाइन लावून काम भागवले, असा आरोप मृताच्या नातेवाइकांकडून केला जातो.सर्पदंश झाल्यानंतर पेशंटची रक्त तपासणी म्हणजे बीटीसीटी केली जाते. यावरून, सर्प विषारी आहे की अविषारी, याची खात्री पटते. या दरम्यान लगेचच सर्पदंशावर असरदार असणारा एएसव्हीचा टेस्ट डोस दिला जातो. परंतु, यामध्ये उशीर झाल्यास किंवा डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्यास मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.यात धक्कादायक बाब म्हणजे उशीर झाल्यानंतर तसेच पेशंटची तब्येत खालावत असताना पुढील उपचारासाठी हलवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वेळी येथील रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. यापुढे पैशांची चणचण भासणाऱ्या या आदिवासींची मोठी धावपळ उडाली आणि खाजगी गाडीची शोधाशोध करत असताना तसेच पुढील उपचारासाठी नेताना लगेचच सोन्या घाटाळ या आदिवासीचा मृत्यू झाला. यामुळे या मृत्यूला जबाबदार डॉक्टर की आरोग्य विभागाची सिस्टीम, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून याच आरोग्य विभागाला शासन कोट्यावधी रु.चा खर्च करत असताना डॉक्टरचा बेजबाबदारपणा, आरोग्य यंत्रणा यामुळे उपचाराच्या नावाखाली आदिवासींना जीव गमवावा लागत आहे. ही बाब संतापजनक आहे. यावर, कारवाईची मागणी मृतांचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केली जात आहे. (वार्ताहर)