शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत आदिवासी घरे तोडण्याची नोटीस बजावणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:16 IST

भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनी वरील आदिवासी कुटुंबियांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा वनखात्याच्या ताब्यात द्यावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी अन्यायकारक नोटिसा बजाविल्याने या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली भिवंडी वनक्षेत्रपाल कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चा मध्ये भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

आदिवासी कुटुंबियांना दिलेल्या नोटीस तात्काळ मागे घ्या ,आदिवासी कुटुंबियांना बेघर करून त्यांना भयभीत करणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा ,आदिवासींच्या रहीवाशी असल्या बाबतचे पुरावे वनविभागाने गोळा करावेत अशा मागण्या घेऊन बस स्थानकातून सुरू झालेल्या या मोर्चाचे वनपरिक्षेत्र कार्यालयात सभेत रूपांतर झाले त्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सुनील लोणे,प्रमोद पवार,दशरथ भालके,संगीत भोमटे,जया पारधी,आशा भोईर,सागर देसक,मोतीराम नामखुडा यांच्या नेतृत्वा खाली पार पडलेल्या या सभेत अनेकांनी मार्गदर्शन करताना वनविभागाच्या अरेरावी कार्यपद्धतीचा पाढा वाचून या पुढे ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला .

त्यानंतर उपविभागीय वन अधिकरी श्रीमती देसाई,भिवंडी वनपरिक्षेत्र अधिकरी संदीप आरदेकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली व सर्व नोटीस प्रकरणांची शहानिशा करून कोणाही आदिवासी कुटुंबियांना बेघर होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन मिळाल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली .दरम्यान शांतीनगर पोलिसांनी या मोर्च्यास परवानगी दिली नसतानाही बेकायदेशीर मोर्चा काढल्या प्रकरणी आयोजक भिवंडी शहर पदाधिकारी सागर देसक ,मोतीराम नामखुडा यांना १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात अली आहे .

शासन एकीकडे जमीन घरे असलेल्यांच्या नावे करण्या बाबत आदेश काढत असताना वन विभाग आदिवासी कष्टकरी समाजाला बेघर करण्याचा घाट घालीत असल्याचा आरोप करीत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला असून शेकडो आदिवासी स्त्री पुरुषांनी भिवंडी वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून या नोटीस बाबत जाब विचारला .स्थानिक शांतीनगर पोलीस ठाणे यांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना , बेघर होऊन मरण्या पेक्षा मोर्चा काढुन पोलिसांच्या लाढया खाऊन मरण पत्करू अशी भूमिका घेत हा मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी