शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

आदिवासींची घरे धोकादायक स्थितीत

By admin | Updated: July 7, 2017 06:18 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या बारकूपाडा भागातील आदिवासींना देण्यात आलेली घरे ही धोकादायक झाली आहेत. या घरांच्या बांधकामाचा

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या बारकूपाडा भागातील आदिवासींना देण्यात आलेली घरे ही धोकादायक झाली आहेत. या घरांच्या बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याने ती घरे पावसात पडतात. त्यामुळे येथील आदिवासींना पुन्हा कुडाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.अंबरनाथ शहराच्या चारही बाजूला आदिवासी पाड्यांची वस्ती आहे. या ठिकाणी राहणारे आदिवासी अंबरनाथचे भूमिपुत्र आहेत. कित्येक पिढ्या या ठिकाणी येथे राहिल्या आहेत. मात्र असे असतानाही या आदिवासी बांधवांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुर्बल घटकातंर्गत पालिका कोट्यावधींची उधळपट्टी करते. मात्र हा निधी अंबरनाथमधील भूमिपुत्र असलेल्या आदिवासींपर्यंत पोहचत नाही. आजही येथील आदिवासी कुडाच्या घरात राहतात. आदिवासी वस्तीच्या चारही बाजूला उंच इमारती उभ्या राहत आहेत. मात्र येथील आदिवासींना साधी पत्र्याची घरेही नाहीत. त्यातही पाच वर्षापूर्वी अंबरनाथ पालिकेने वाल्मिकी आवास योजनेतून येथील आदिवासींना दिलेली घरे आज धोकादायक झाली आहेत. घरांचे छप्पर आणि भिंती पडण्यास सुरूवात झाली आहे. या धोकादायक स्थितीतील घरात राहण्याऐवजी येथील आदिवासी आता नव्याने कुडाची पारंपारिक घरे बांधून त्यात राहणे पसंत केले आहे. त्यांची ही अवहेलना येथेच थांबलेली नाही. शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आदिवासी बांधवांना स्वच्छतागृह बांधण्याची सक्ती करण्यात आली. मात्र या स्वच्छतागृहातील मल वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने वस्तीत दुर्गंधी पसरते. त्यातच वस्तीत पाणी नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. बारकूपाडा येथील आदिवासी वस्तीतील प्रत्येक घर पडक्या अवस्थेत आहे. त्यांची देखभाल दुरूस्ती करण्याची क्षमता या आदिवासींमध्ये राहिलेली नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहे पडले: घरातील स्वच्छतागृह पाण्याअभावी वापरणे शक्य होत नसल्याने येथील सर्व वस्ती सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करते. मात्र ते स्वच्छतागृहही १० दिवसांपूर्वी पडल्याने आज येथील आदिवासी पुन्हा उघड्यावर प्रातर्विधी करण्याच्या मानसिकतेत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने पडलेल्या स्वच्छतागृहाची दुरूस्ती करावी अशी येथील आदिवासींनी मागणी केली आहे. उद्या आम्ही उघड्यावरच प्रातर्विधीला गेलो तर पालिकाच दंड आकारेल असे या आदिवासींनी सांगितले.