शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी जंगलात वाट चुकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात काढले शोधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:35 IST

मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात शोधून काढले

जयंत धुळपकाेंढाणे, दि. 16 -  मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या मुंबईतील बोरिवली येथील स्वप्नील मगदूम(24), मिश्वाल सॅलियन(24), ज्योती पळसमकर(20), ज्यूली डिसोझा(22) या चौघा ट्रेकर्सना, रातोरात उंबरवाडी मधील आदिवासी बांधव एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा यांनी चार तासात शोधून काढून कजर्त पोलीसांना मोठे सहकार्य केले आहे.     मंगळवारी रात्री 9.45 वाजता वाट चूकलेल्या या चौघांपैकी स्वप्नील कदम यांने  कर्जत पोलीस ठाण्यात फोन करुन, मी व माझ्या सोबतचे एक मित्न व दोन मैत्रिणी काेंढाणे येथील जंगलात वाट चुकले असून, जंगलात भरकटलो आहेत ,अशी माहिती दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी, प्रसंगाचे गांभिर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राह्ण्याचा सल्ला दिला. स्वप्नील यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्यावेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी जवळ धबधब्या असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोडाणो गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्याबाबत काय काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली.         रात्नीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणो अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोढाणो गावांतील स्थानिक आदिवासी बंधूंची मदत घेवून कर्जत पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एम.बी. शिंदे, पोलीस शिपाई एस.एस.सहाणो, महिला पोलीस कर्मचारी ए.एस.जाधव व सहा फौजदार बजरंग मुसळे असे सरकारी जीपसह रवाना झाले. काेंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात अंधारात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत मेहनतीने व मोठ्या धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करुन, या चौघां र्पयत पोहोचण्यात या पथकास यश आले. आणि  स्वप्नील मगदूम, मिश्वाल सॅलियन, ज्योती पळसमकर, ज्यूली डिसोझा या चौघांना जंगलातून गावांत सुखरुप आणण्यात यश मिळविले आहे.    अपरिचित जंगल भागात निसर्ग पर्यटनाकरिता जावून जीवावर आढावून घेण्याचा प्रसंग रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दुस:यांदा घडला असून, केवळ पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहयोगामुळे प्राण वाचले आहेत.