शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

संततधार पावसाने उडाली त्रेधातिरपीट!

By admin | Updated: June 28, 2017 03:13 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कल्याणच्या शिवाजी चौकात रस्ता खचून भगदाड पडल्याने तेथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.कल्याण-डोंबिवली परिसरात आतापर्यंत ४२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवलीत रेल्वेस्थानक परिसर, मार्केट, पश्चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड, तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकाराम नगर, मानपाडा रोड, औद्योगिक निवासी विभाग, नांदिवली-भोपर, कल्याण-शीळ रोड, पश्चिमेतील गोपीनाथ चौक, केळकर रोड आदी ठिकाणी मंगळवारी माठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कल्याणमध्ये शिवाजी चौक, महमद अली चौक, जोशी बाग, कुं भारवाडा आदी परिसर जलमय झाले होते. महमद अली चौक परिसरातील दुकानांमध्ये गटाराचे सांडपाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी चौकात रस्ता खचल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाणी आणि खचलेल्या रस्ता यामुळे तासभर वाहतूककोंडी झाली होती. बल्याणी येथील घरे पाण्याखालीलोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : पावसाच्या संततधारेमुळे केडीएमसीतील प्रभाग क्र मांक ११ बल्याणी येथील मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे चाळीतील रहिवाशांचे हाल झाले आहेत. याप्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पावसाने तीन-चार दिवसांपासून हजेरी लावल्याने मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे पाण्याखाली आहेत. घरात पाण्याबरोबर गाळ आल्याने त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. केडीएमसीतील एका सफाई कामगाराने केलेल्या चाळीच्या बांधकामामुळे नाला बुजल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही. बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती आहे. सोमवारी ईदच्या दिवशी तेथील रहिवाशांना पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला. तीन दिवसांपासून येथील पुरुष नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडले नाहीत.