शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

संततधार पावसाने उडाली त्रेधातिरपीट!

By admin | Updated: June 28, 2017 03:13 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कल्याणच्या शिवाजी चौकात रस्ता खचून भगदाड पडल्याने तेथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.कल्याण-डोंबिवली परिसरात आतापर्यंत ४२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवलीत रेल्वेस्थानक परिसर, मार्केट, पश्चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड, तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकाराम नगर, मानपाडा रोड, औद्योगिक निवासी विभाग, नांदिवली-भोपर, कल्याण-शीळ रोड, पश्चिमेतील गोपीनाथ चौक, केळकर रोड आदी ठिकाणी मंगळवारी माठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कल्याणमध्ये शिवाजी चौक, महमद अली चौक, जोशी बाग, कुं भारवाडा आदी परिसर जलमय झाले होते. महमद अली चौक परिसरातील दुकानांमध्ये गटाराचे सांडपाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी चौकात रस्ता खचल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाणी आणि खचलेल्या रस्ता यामुळे तासभर वाहतूककोंडी झाली होती. बल्याणी येथील घरे पाण्याखालीलोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : पावसाच्या संततधारेमुळे केडीएमसीतील प्रभाग क्र मांक ११ बल्याणी येथील मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे चाळीतील रहिवाशांचे हाल झाले आहेत. याप्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पावसाने तीन-चार दिवसांपासून हजेरी लावल्याने मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे पाण्याखाली आहेत. घरात पाण्याबरोबर गाळ आल्याने त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. केडीएमसीतील एका सफाई कामगाराने केलेल्या चाळीच्या बांधकामामुळे नाला बुजल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही. बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती आहे. सोमवारी ईदच्या दिवशी तेथील रहिवाशांना पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला. तीन दिवसांपासून येथील पुरुष नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडले नाहीत.