शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच असल्याचे दूरध्वनी अग्निशमन दलाच्या कार्यालयांमध्ये खणखणत आहेत. पडलेल्या झाडांपैकी २६२ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची पुरती दमछाक होत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने अखेर कंत्राटदाराच्या कामगारांचा आधार घ्यावा लागला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या आधी शनिवारी रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. १० ते १५ मिनिटेच पाऊस पडला; पण वादळी वाऱ्यात तेव्हाही महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती. कल्याण पश्चिमेत एका घराचे नुकसान झाले, तर तेथेच विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने ट्रान्स्फाॅर्मरला आग लागल्याची घटनाही घडली. झाड पडल्याने काही ठिकाणांचे रस्तेही बंद झाल्याचे कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाले. सायट्यांची पार्किंग शेड, लोखंडी गेटचेही नुकसान झाले. कोसळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून ती झाडे बाजूला करून वाहतूक आणि जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रविवारी सुरू असतानाच, सोमवार (दि. १७)च्या ‘तौक्ते’नेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

झाडे कोसळण्याबरोबरच घरांवरील, सोसायट्यांच्या गच्च्यांवरील सिमेंट आणि पत्र्याची शेड‌्स वाऱ्याबरोबर उडून इतरत्र जाऊन पडली. महामार्गावरील होर्डिंग्ज कोसळून काहीजण जखमीही झाले. वीजपुरवठाही बहुतांश ठिकाणी खंडित झाला होता.

दरम्यान, झाडे पडण्याच्या घटना आजही सुरूच आहेत. दर १० मिनिटांनी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पडलेली झाडे हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने ते सुटीवर आहेत. काहीजण घरातील विवाह सोहळ्यानिमित्त सुटीवर आहेत. आधीच पुरेशा मनुष्यबळाची कमतरता असताना, सध्या उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच दिवस-रात्र राबून पडलेली झाडे हटवावी लागत आहेत. यात काही कर्मचारी तर गेले चार ते पाच दिवस घरीही गेलेले नाहीत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

--------------

केडीएमसीच्या अग्निशमन दलात मागील वर्षी २८ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ पुरेसे आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने आपण कंत्राटदाराच्या २० कामगारांची मदत घेतली आहे.

- नामदेव चौधरी, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी

-----------------------------