शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच असल्याचे दूरध्वनी अग्निशमन दलाच्या कार्यालयांमध्ये खणखणत आहेत. पडलेल्या झाडांपैकी २६२ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची पुरती दमछाक होत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने अखेर कंत्राटदाराच्या कामगारांचा आधार घ्यावा लागला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या आधी शनिवारी रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. १० ते १५ मिनिटेच पाऊस पडला; पण वादळी वाऱ्यात तेव्हाही महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती. कल्याण पश्चिमेत एका घराचे नुकसान झाले, तर तेथेच विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने ट्रान्स्फाॅर्मरला आग लागल्याची घटनाही घडली. झाड पडल्याने काही ठिकाणांचे रस्तेही बंद झाल्याचे कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाले. सायट्यांची पार्किंग शेड, लोखंडी गेटचेही नुकसान झाले. कोसळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून ती झाडे बाजूला करून वाहतूक आणि जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रविवारी सुरू असतानाच, सोमवार (दि. १७)च्या ‘तौक्ते’नेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

झाडे कोसळण्याबरोबरच घरांवरील, सोसायट्यांच्या गच्च्यांवरील सिमेंट आणि पत्र्याची शेड‌्स वाऱ्याबरोबर उडून इतरत्र जाऊन पडली. महामार्गावरील होर्डिंग्ज कोसळून काहीजण जखमीही झाले. वीजपुरवठाही बहुतांश ठिकाणी खंडित झाला होता.

दरम्यान, झाडे पडण्याच्या घटना आजही सुरूच आहेत. दर १० मिनिटांनी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पडलेली झाडे हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने ते सुटीवर आहेत. काहीजण घरातील विवाह सोहळ्यानिमित्त सुटीवर आहेत. आधीच पुरेशा मनुष्यबळाची कमतरता असताना, सध्या उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच दिवस-रात्र राबून पडलेली झाडे हटवावी लागत आहेत. यात काही कर्मचारी तर गेले चार ते पाच दिवस घरीही गेलेले नाहीत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

--------------

केडीएमसीच्या अग्निशमन दलात मागील वर्षी २८ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ पुरेसे आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने आपण कंत्राटदाराच्या २० कामगारांची मदत घेतली आहे.

- नामदेव चौधरी, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी

-----------------------------