शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच असल्याचे दूरध्वनी अग्निशमन दलाच्या कार्यालयांमध्ये खणखणत आहेत. पडलेल्या झाडांपैकी २६२ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची पुरती दमछाक होत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने अखेर कंत्राटदाराच्या कामगारांचा आधार घ्यावा लागला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या आधी शनिवारी रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. १० ते १५ मिनिटेच पाऊस पडला; पण वादळी वाऱ्यात तेव्हाही महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती. कल्याण पश्चिमेत एका घराचे नुकसान झाले, तर तेथेच विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने ट्रान्स्फाॅर्मरला आग लागल्याची घटनाही घडली. झाड पडल्याने काही ठिकाणांचे रस्तेही बंद झाल्याचे कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाले. सायट्यांची पार्किंग शेड, लोखंडी गेटचेही नुकसान झाले. कोसळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून ती झाडे बाजूला करून वाहतूक आणि जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रविवारी सुरू असतानाच, सोमवार (दि. १७)च्या ‘तौक्ते’नेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

झाडे कोसळण्याबरोबरच घरांवरील, सोसायट्यांच्या गच्च्यांवरील सिमेंट आणि पत्र्याची शेड‌्स वाऱ्याबरोबर उडून इतरत्र जाऊन पडली. महामार्गावरील होर्डिंग्ज कोसळून काहीजण जखमीही झाले. वीजपुरवठाही बहुतांश ठिकाणी खंडित झाला होता.

दरम्यान, झाडे पडण्याच्या घटना आजही सुरूच आहेत. दर १० मिनिटांनी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पडलेली झाडे हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने ते सुटीवर आहेत. काहीजण घरातील विवाह सोहळ्यानिमित्त सुटीवर आहेत. आधीच पुरेशा मनुष्यबळाची कमतरता असताना, सध्या उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच दिवस-रात्र राबून पडलेली झाडे हटवावी लागत आहेत. यात काही कर्मचारी तर गेले चार ते पाच दिवस घरीही गेलेले नाहीत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

--------------

केडीएमसीच्या अग्निशमन दलात मागील वर्षी २८ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ पुरेसे आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने आपण कंत्राटदाराच्या २० कामगारांची मदत घेतली आहे.

- नामदेव चौधरी, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी

-----------------------------