शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बिल न दिल्यास ‘खरेदी केलेल्या वस्तू मोफत’ या रेल्वेच्या उपक्रमाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:22 IST

बिल घेण्याचे प्रमाण अवघे १० टक्के : गाड्यांच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांत निरुत्साह

ठाणे : रेल्वेस्थानकांवरील उपाहारगृहांतील अन्नपदार्थ खरेदी करताना बिल न दिल्यास खरेदी केलेले पदार्थ मोफत दिले जातील, असे रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल घेण्यास वेळ नसल्याने रेल्वेच्या या उपक्रमाकडे प्रवाशांनी चक्क पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वेस्थानकात बिल घेण्याचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांच्या पुढे जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७९० अप-डाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर २४६ अप-डाउन तसेच १३२ अप-डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात.

ठाणे स्थानकात एक ते १० ए असे ११ फलाट असून त्यांच्यावर एकूण १८ उपाहारगृहे आणि एक फूड प्लाझा आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या उपाहारगृहधारकांकडून बिल न दिल्यास अन्नपदार्थ मोफत मिळतील, असे रेल्वे प्रवासात वारंवार कानांवर पडते. यानुसार, उपाहारगृहधारकांनीही मशीन लावून बिल देण्याची तयारी दर्शवली आहे. पेपरच्या रोलसाठी १५ रुपये जास्त मोजण्याचीही तयारी केली आहे. मात्र प्रवाशांना बिलासाठी वेळ नसल्याचे सांगितले जाते.रविवारी तर शून्य प्रतिसाद : रेल्वेस्थानकावरील सर्वच उपाहारगृहांतून दिवसाला किती बिल देण्यात आलेले आहेत, याची माहिती दररोज ठाणे रेल्वे प्रशासनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ती माहिती पुढे मुंबईतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. त्यातच बिल घेण्याचे प्रमाण हे साधारणत: १० टक्क्यांच्या आसपास पोहोचलेले आहे. मात्र, रविवारी हे प्रमाण जवळपास मायनसमध्येच दिसत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते.

रेल्वेचा हा उपक्रम चांगला आहे. पण, गाडी गेल्यावर दुसरी गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे १० रुपयांचा एखादा अन्नपदार्थ घेतल्यानंतर त्याचे बिल घेणे शक्य नाही. ते अन्नपदार्थ घेऊन बिल न घेताच जाणेच योग्य ठरते. - सुशांत चव्हाण, प्रवासी