शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बिल न दिल्यास ‘खरेदी केलेल्या वस्तू मोफत’ या रेल्वेच्या उपक्रमाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:22 IST

बिल घेण्याचे प्रमाण अवघे १० टक्के : गाड्यांच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांत निरुत्साह

ठाणे : रेल्वेस्थानकांवरील उपाहारगृहांतील अन्नपदार्थ खरेदी करताना बिल न दिल्यास खरेदी केलेले पदार्थ मोफत दिले जातील, असे रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल घेण्यास वेळ नसल्याने रेल्वेच्या या उपक्रमाकडे प्रवाशांनी चक्क पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वेस्थानकात बिल घेण्याचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांच्या पुढे जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७९० अप-डाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर २४६ अप-डाउन तसेच १३२ अप-डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात.

ठाणे स्थानकात एक ते १० ए असे ११ फलाट असून त्यांच्यावर एकूण १८ उपाहारगृहे आणि एक फूड प्लाझा आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या उपाहारगृहधारकांकडून बिल न दिल्यास अन्नपदार्थ मोफत मिळतील, असे रेल्वे प्रवासात वारंवार कानांवर पडते. यानुसार, उपाहारगृहधारकांनीही मशीन लावून बिल देण्याची तयारी दर्शवली आहे. पेपरच्या रोलसाठी १५ रुपये जास्त मोजण्याचीही तयारी केली आहे. मात्र प्रवाशांना बिलासाठी वेळ नसल्याचे सांगितले जाते.रविवारी तर शून्य प्रतिसाद : रेल्वेस्थानकावरील सर्वच उपाहारगृहांतून दिवसाला किती बिल देण्यात आलेले आहेत, याची माहिती दररोज ठाणे रेल्वे प्रशासनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ती माहिती पुढे मुंबईतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. त्यातच बिल घेण्याचे प्रमाण हे साधारणत: १० टक्क्यांच्या आसपास पोहोचलेले आहे. मात्र, रविवारी हे प्रमाण जवळपास मायनसमध्येच दिसत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते.

रेल्वेचा हा उपक्रम चांगला आहे. पण, गाडी गेल्यावर दुसरी गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे १० रुपयांचा एखादा अन्नपदार्थ घेतल्यानंतर त्याचे बिल घेणे शक्य नाही. ते अन्नपदार्थ घेऊन बिल न घेताच जाणेच योग्य ठरते. - सुशांत चव्हाण, प्रवासी