शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गणेशोत्सवासाठी कोकणात ट्रॅव्हल्सने जायला दुप्पट भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

डोंबिवली : दीड वर्ष कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. अनेक ठिकाणचे भाडे वाढले असून गाड्यांची संख्याही ...

डोंबिवली : दीड वर्ष कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. अनेक ठिकाणचे भाडे वाढले असून गाड्यांची संख्याही वाढली आहे. गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाली असून कोकणात जाण्यासाठीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असल्याने सिंधुदुर्ग, मालवणला जाण्यासाठी दुप्पट भाडे ट्रॅव्हल्स चालकांनी आकारल्याचे निदर्शनास आले.

जळगाव, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी भागात जाण्यासाठीदेखील गतवर्षीच्या तुलनेत १५० ते २०० रुपये भाडे जास्त आकारले आहे. डिझेल भाववाढीचे कारण पुढे करत व्यावसायिकांनी गणेशोत्सवातही संधी सोडली नसून त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यामुळे एकीकडे प्रवास करायला मिळाल्याचे समाधान असले तरी, महागाईची झळ बसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

-----------

या मार्गावर सर्वाधिक टॅव्हल्स

मुंबई - सिंधुदुर्ग

नवी मुंबई - कोल्हापूर

नवी मुंबई - मालवण

पनवेल - सांगली

डोंबिवली - जळगाव

डोंबिवली - कोल्हापूर

------^^^^--------------

भाडे वाढले

आधीचे सध्याचे

डोंबिवली सिंधुदुर्ग १५००। १८००

डोंबिवली जळगाव ५००। ७००

पनवेल मालवण। १५०० । २०००

------------------------

३) दीड, दोन वर्षानंतर आता कुठे बरे दिवस यायला लागले आहेत. गणेशोत्सव महत्त्वाचा सण असून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांना खूप मागणी आहे. आता कोकणात गेलेले प्रवासी परत माघारी फिरतील. त्यामुळे ते येतानादेखील व्यवसाय तेजीत असेल. दीड वर्ष गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता.

- ट्रॅव्हल व्यावसायिक

--/--------

केवळ मोठ्या बस नव्हे तर कारलासुद्धा मागणी होती. त्यामुळे गणेशोत्सव निमित्ताने टूर्स ट्रॅव्हल्स व्यवसायाला गती मिळाली आहे. कार व्यवसायातदेखील इंधन दरवाढीमुळे किमी मागे २ रुपये वाढवावे लागले. प्रवासीदेखील अडचण समजून घेत असल्याने भाडे मिळत आहेत.

- गौरव खत्री, टूर्स कार मालक व्यावसायिक

---/-------------

ट्रेनने जाणे परवडत असले तरी वेळेत तिकीट मिळणे हे आव्हान असते. त्यामुळे खासगी बसने जावे लागते. खासगी बसला सणासुदीत खूप मागणी असते. कोकणात जायला तर एरव्ही ५०० रुपये लागतात, पण सणाला मात्र तेच भाडे तिपटीने आकारले जाते. प्रवाशांना गरज असते. त्यामुळे जास्तीचे भाडे भरून जावे लागते.

- हरिश्चंद्र गोलतकर, प्रवासी