शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

गणेशोत्सवासाठी कोकणात ट्रॅव्हल्सने जायला दुप्पट भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

डोंबिवली : दीड वर्ष कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. अनेक ठिकाणचे भाडे वाढले असून गाड्यांची संख्याही ...

डोंबिवली : दीड वर्ष कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. अनेक ठिकाणचे भाडे वाढले असून गाड्यांची संख्याही वाढली आहे. गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाली असून कोकणात जाण्यासाठीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असल्याने सिंधुदुर्ग, मालवणला जाण्यासाठी दुप्पट भाडे ट्रॅव्हल्स चालकांनी आकारल्याचे निदर्शनास आले.

जळगाव, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी भागात जाण्यासाठीदेखील गतवर्षीच्या तुलनेत १५० ते २०० रुपये भाडे जास्त आकारले आहे. डिझेल भाववाढीचे कारण पुढे करत व्यावसायिकांनी गणेशोत्सवातही संधी सोडली नसून त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यामुळे एकीकडे प्रवास करायला मिळाल्याचे समाधान असले तरी, महागाईची झळ बसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

-----------

या मार्गावर सर्वाधिक टॅव्हल्स

मुंबई - सिंधुदुर्ग

नवी मुंबई - कोल्हापूर

नवी मुंबई - मालवण

पनवेल - सांगली

डोंबिवली - जळगाव

डोंबिवली - कोल्हापूर

------^^^^--------------

भाडे वाढले

आधीचे सध्याचे

डोंबिवली सिंधुदुर्ग १५००। १८००

डोंबिवली जळगाव ५००। ७००

पनवेल मालवण। १५०० । २०००

------------------------

३) दीड, दोन वर्षानंतर आता कुठे बरे दिवस यायला लागले आहेत. गणेशोत्सव महत्त्वाचा सण असून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांना खूप मागणी आहे. आता कोकणात गेलेले प्रवासी परत माघारी फिरतील. त्यामुळे ते येतानादेखील व्यवसाय तेजीत असेल. दीड वर्ष गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता.

- ट्रॅव्हल व्यावसायिक

--/--------

केवळ मोठ्या बस नव्हे तर कारलासुद्धा मागणी होती. त्यामुळे गणेशोत्सव निमित्ताने टूर्स ट्रॅव्हल्स व्यवसायाला गती मिळाली आहे. कार व्यवसायातदेखील इंधन दरवाढीमुळे किमी मागे २ रुपये वाढवावे लागले. प्रवासीदेखील अडचण समजून घेत असल्याने भाडे मिळत आहेत.

- गौरव खत्री, टूर्स कार मालक व्यावसायिक

---/-------------

ट्रेनने जाणे परवडत असले तरी वेळेत तिकीट मिळणे हे आव्हान असते. त्यामुळे खासगी बसने जावे लागते. खासगी बसला सणासुदीत खूप मागणी असते. कोकणात जायला तर एरव्ही ५०० रुपये लागतात, पण सणाला मात्र तेच भाडे तिपटीने आकारले जाते. प्रवाशांना गरज असते. त्यामुळे जास्तीचे भाडे भरून जावे लागते.

- हरिश्चंद्र गोलतकर, प्रवासी