शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परिवहन सेवा ४० दिवसांनी पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा, २१ बस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:40 IST

शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले. 

मीरा राेड :मीरा-भाईंदर महापालिक परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलीस बंदोबस्त देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पालिका आयुक्तांनी शुक्रवारी पोलीस अधिकारी, ठेकेदार व परिवहन कर्मचारी संघटना यांची बैठक घेत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले. 

आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रशासनाने मुद्दाम बससेवा स्वत:च सुरू केली नाही. पालिकेच्या विधी सल्लागार आणि ठेकेदार आदींचे संगनमत असल्याने न्यायालयात पालिका हिताची बाजू भक्कमपणे मांडली जाणार नाही, अशी कल्पना होती. न्यायालयाच्या आदेशावरून ते स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मीरा-भाईंदर  - वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पुढाकार घेत त्यावर तोडगा काढला. दाते यांच्या सूचनेनुसार बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत २० हजार रु पये व बोनस देण्याची चर्चा झाली. ठेकेदाराने मंगळवारी प्रत्येकी पाच हजार बोनस द्यायचा आणि उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले.

शुक्रवारी रात्री भाईंदर ते उत्तन, चौक आणि मीरा रोड भागात पाच बस चालवण्यात आल्या. शनिवारी उपायुक्त अजित मुठे यांनी ठेकेदारास २१ बस नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचे पत्र दिले होते. परंतु, सकाळी १५ बस ठेकेदाराने सुरू केल्या असल्याची माहिती मुठे यांनी दिली.

या मार्गावर साेडण्यात आल्या बस - भाईंदर पश्चिमहून उत्तन, चौक , ठाणे, उत्तन ते मानोरी, भाईंदर पूर्वेहून बोरिवली तर मीरा रोडवरून रामदेव पार्क, शांती विद्यानगरी - घोडबंदर डेपो, वेस्टर्न पार्क , ठाणे या मार्गावर बस सोडण्यात आल्या. १०० कर्मचारी कामावर हजर झाले होते. दुपारनंतरआणखी सहा बस सुरू करण्यात आल्या.  यामुळे शहरापासून लांब राहणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे. बस बंद असल्यामुळे रिक्षाचा खर्चकरावा लागत हाेता.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर