शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:21 IST

ग्रामीण रस्त्याची होणार चाळण : सदस्यांचा विरोध मावळला

ठाणे : मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठमोठ्या मशिनरी लागणार आहे. या मशिनरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून धावणार आहे. यामुळे रस्ते खराब होऊन ग्रामीण जनतेच्या समस्या वाढणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद काही सदस्यांनी यास विरोध केला होता. अखेर, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विरोध मावळल्यामुळे या रस्त्यांवरून मशिनरी वाहतुकीस मंजुरी मिळाली आहे.

या महामार्गाचे काम एका खाजगी कंपनीकडून होत आहे. यासाठी कंपनी मोठमोठ्या मशिनरी व वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. या वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण होऊन ते खराब होतील. याचा फटका ग्रामीण जनतेला बसणार असून विविध समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित गावकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीदेखील या रस्ते वापरण्याच्या परवानगीला विरोध दर्शवला होता. मात्र, तो आता मावळला असून संबंधित सदस्यांनी सहमतीने संमती दिल्यामुळे रस्ते वापरण्यास जिल्हा परिषदेने परवानगी मंजूर केली आहे.डिपॉझिट न घेतल्याने नाराजीया वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच डिपॉझिट करून घेण्याच्या मुद्यावरही बºयाच वेळा चर्चा झाली. पण, ठोस आश्वासनापूर्वीच रस्ते वापरण्याच्या परवानगीला मंजुरी दिल्याचे काही नाराज सदस्यांकडून सांगितले जात आहे. या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त आहे. ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमी गेला आहे. तर, शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमी जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, या रस्त्यांवरून वाहने सतत रात्रंदिवस येजा करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग