शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:21 IST

ग्रामीण रस्त्याची होणार चाळण : सदस्यांचा विरोध मावळला

ठाणे : मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठमोठ्या मशिनरी लागणार आहे. या मशिनरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून धावणार आहे. यामुळे रस्ते खराब होऊन ग्रामीण जनतेच्या समस्या वाढणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद काही सदस्यांनी यास विरोध केला होता. अखेर, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विरोध मावळल्यामुळे या रस्त्यांवरून मशिनरी वाहतुकीस मंजुरी मिळाली आहे.

या महामार्गाचे काम एका खाजगी कंपनीकडून होत आहे. यासाठी कंपनी मोठमोठ्या मशिनरी व वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. या वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण होऊन ते खराब होतील. याचा फटका ग्रामीण जनतेला बसणार असून विविध समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित गावकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीदेखील या रस्ते वापरण्याच्या परवानगीला विरोध दर्शवला होता. मात्र, तो आता मावळला असून संबंधित सदस्यांनी सहमतीने संमती दिल्यामुळे रस्ते वापरण्यास जिल्हा परिषदेने परवानगी मंजूर केली आहे.डिपॉझिट न घेतल्याने नाराजीया वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच डिपॉझिट करून घेण्याच्या मुद्यावरही बºयाच वेळा चर्चा झाली. पण, ठोस आश्वासनापूर्वीच रस्ते वापरण्याच्या परवानगीला मंजुरी दिल्याचे काही नाराज सदस्यांकडून सांगितले जात आहे. या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त आहे. ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमी गेला आहे. तर, शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमी जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, या रस्त्यांवरून वाहने सतत रात्रंदिवस येजा करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग