शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; दहशतवादी अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
4
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
5
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
6
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
7
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
8
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
9
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
10
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
11
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
12
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
13
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
14
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
15
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
16
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
17
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
18
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
19
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
20
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!

वर्सोवा-विरार सागरी मार्गाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष मागणी

By धीरज परब | Updated: May 29, 2025 08:32 IST

उत्तन पासून वसई विरारच्या मच्छीमारांना दिलासा मिळण्यासह कोट्यवधी रुपयांची होणार बचत

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मुंबईच्या वर्सोवा वरून उत्तन व पुढे वसई-विरारला जाणारा सागरी मार्ग अर्थात कोस्टल रोड हा व्हाया उत्तन न नेता दहिसर-भाईंदर ६० मीटर लिंक रस्ता मार्गे वसई - विरारला नेल्यास उत्तन  पासून वसई - विरार किनारपट्टी वरील हजारो मच्छीमारांना दिलासा मिळेल. शिवाय कोस्टल मार्गाच्या खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.

मुंबई ते वर्सोवा हा सागरी मार्ग वर्सोवा वरून पुढे भाईंदरचे उत्तन व पुढे वसई - विरार, पालघर, वाढवण बंदर असा जाणार आहे. मात्र त्याच वेळी दहिसर पश्चिम - भाईंदर ६० मीटर रुंदीचा लिंक रस्ता हा पुढे वसई - विरार ला जोडला जाणार आहे. वर्सोवा ते विरार हा कोस्टल मार्ग उत्तन वरून वसई - विरार ला आणि पुढे पालघर असा नेण्यात किनारपट्टी वरील हजारो मच्छीमारांना त्याचा फटका बसणार आहे. आधीच मासेमारी संकटात असताना कोस्टल रोड त्यात भर टाकणारा ठरण्याची भीती मच्छीमारांनी जाहीरपणे व्यक्त करत कोस्टल मार्गास विरोध केला आहे.

गोराई पासून पालघर पर्यंतचा समुद्र किनारा हा पर्यटन क्षेत्र देखील असून त्यावर हजारो स्थानिक भूमिपुत्रांचे व्यवसाय - उपजीविका अवलंबून आहे. कोस्टल मार्गा मुळे किनारपट्टी आणि समुद्राचे निसर्ग सौंदर्य बाधित होणार असल्याने येथील पर्यटन व्यवसायास फटका बसणार आहे. उत्तन भागातील मच्छीमार संस्था, कोळी जमात, स्थानिक माजी नगरसेवक आदींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून उत्तन समुद्रातून प्रस्तावित कोस्टल मार्गास विरोध दर्शवत भूमिपुत्र मच्छीमारांचे होणारे नुकसान आणि परिणाम बाबत माहिती दिली. व पर्याय काढण्याची विनंती केली होती. वसई - विरार व पुढे पालघर दरम्यानच्या सागरी किनारपट्टीवरील अनेक कोळीवाडे आणि हजारो मच्छीमारांचा तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा विचार करण्याची मागणी पुढे आली. 

मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी व मीरा-भाईंदर, वसई-विरार शहरातील नागरिकांना पश्चिम पट्ट्यात मोठ्या रस्त्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीचा विचार करून हा राज्य शासनाने कोस्टल मार्गाचा चांगला निर्णय घेतलेला आहे असे मंत्री सरनाईक म्हणाले. 

किनारपट्टी परिसर पुर्णतः मच्छीमार कोळी बांधवांचा असल्याने सर्वसामान्य कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. आगरी-कोळी बांधव हे महाराष्ट्राचे भुषण असून त्यांच्या संस्कृतीला व परंपरेला नेहमीच आपल्या सरकारने प्रोत्साहन दिले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या सरकारचे आभार मानले आहेत. परंतू, वर्सोवा ते उत्तन, उत्तन ते वसई हा कोस्टल मार्ग जर उत्तन गावाजवळील समुद्रातून गेला तर यामुळे कोळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावर फार मोठे संकट येणार आहे. त्यामुळे सदरचा कोस्टल रोड हा उत्तन गावाजवळील समुद्रातून न करता वर्सोवा ते दहिसर मार्गे आणावा. त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दहिसर ते सुभाषचंद्र बोस मीरा-भाईंदर हा ६० मीटरचा रस्ता गेल्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला असून जागेवर त्याचे कामही चालू आहे. या ६० मीटर रस्त्याला वर्सोवा ते दहिसर हा कोस्टल रोड जोडल्यास सुभाषचंद्र बोस मैदानावरून भाईंदर मार्गे वसई-विरारला नेल्यास राज्य शासनाच्या खर्चातही बचत होईल. तसेच काळी बांधवांच्या मत्स्य व्यवसायावर जे संकट येणार आहे ते ही दूर होईल असे मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. 

उत्तन मार्गे जाणारा हा कोस्टल रोड रद्द करून तो वर्सोवा ते दहिसर मार्गे स्थलांतरीत करून कोळी बांधवांची समस्या दूर करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रा द्वारे केली आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक