शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उल्हासनगर महापालिका आयक्तांच्या बदलीने प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:47 IST

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यात समीर उन्हाळे यांना आयुक्त पदावरुन हटवून आयएएस दर्जाच्या डॉ राजा धायनिधी यांची आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली. आयुक्तांच्या वारंवार बदलीने, महापालिकेतील प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस लागली असून स्थानिक नेते व प्रभारी अधिकारी गळ्यातगळे घालून भ्रष्टाचार करीत असल्याची सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले. तसेच कोरोना रुग्ण शेजारच्या शहरात वाढत असताना उल्हासनगर कोरोना मुक्त शहर ठेवण्यात त्यांना यश आले होते. मात्र अचानक सुधाकर देशमुख यांची गेल्या एका महिन्या पूर्वी बदली होऊन आयुक्त पदी समीर उन्हाळे यांची नियुक्ती झाली. उन्हाळे यांनी वाढत्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नवीन कोविड रुग्णालय स्थापन करून विविध विभागातील सावळागोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका महिन्यात त्यांची बदली होऊन डॉ राजा धायानिधी यांची नियुक्त झाली.

 महापालिकेचा एकूण कारभार बघता कोणताही अधिकारी येथे येण्यास तयार नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, ४ प्रभारी अधिकारी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम व वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, विधी अधिकारी, पालिका सचिव, नगररचनाकार आदी वर्ग १ व २ चे ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वच विभागाचा पदभार कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे असून विभागात सावळागोंधळ उडाला आहे. प्रभारी अधिकारी स्थानिक नेत्यांच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोप होत असून त्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मक्तेदारी निर्माण केली. अश्या अधिकाऱ्याची चौकशी अथवा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, चौकशी करू नये. असे ठराव महापालिकेत मंजूर झाले. असा आरोप होत असून सर्वत्र भ्रष्टाचाराचा बोलबाला सुरु आला आहे. 

सत्ताधारी व विरोधी पक्षा बाबत संभ्रम 

महापालिकेत अपुरा अधिकारी, आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला बाहेर काढण्या ऐवजी सत्ताधारी व विरोधी पक्ष पालिकेला लुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आदी अनेक कारणाने शासन नियुक्त अधिकारी पालिकेत आले पाहिजे. असे कोणत्याही सत्ताधारी व विरोधी पक्षाचा नेता उघडउघड भूमिका घेत नसून त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.