शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयक्तांच्या बदलीने प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:47 IST

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यात समीर उन्हाळे यांना आयुक्त पदावरुन हटवून आयएएस दर्जाच्या डॉ राजा धायनिधी यांची आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली. आयुक्तांच्या वारंवार बदलीने, महापालिकेतील प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस लागली असून स्थानिक नेते व प्रभारी अधिकारी गळ्यातगळे घालून भ्रष्टाचार करीत असल्याची सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले. तसेच कोरोना रुग्ण शेजारच्या शहरात वाढत असताना उल्हासनगर कोरोना मुक्त शहर ठेवण्यात त्यांना यश आले होते. मात्र अचानक सुधाकर देशमुख यांची गेल्या एका महिन्या पूर्वी बदली होऊन आयुक्त पदी समीर उन्हाळे यांची नियुक्ती झाली. उन्हाळे यांनी वाढत्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नवीन कोविड रुग्णालय स्थापन करून विविध विभागातील सावळागोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका महिन्यात त्यांची बदली होऊन डॉ राजा धायानिधी यांची नियुक्त झाली.

 महापालिकेचा एकूण कारभार बघता कोणताही अधिकारी येथे येण्यास तयार नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, ४ प्रभारी अधिकारी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम व वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, विधी अधिकारी, पालिका सचिव, नगररचनाकार आदी वर्ग १ व २ चे ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वच विभागाचा पदभार कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे असून विभागात सावळागोंधळ उडाला आहे. प्रभारी अधिकारी स्थानिक नेत्यांच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोप होत असून त्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मक्तेदारी निर्माण केली. अश्या अधिकाऱ्याची चौकशी अथवा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, चौकशी करू नये. असे ठराव महापालिकेत मंजूर झाले. असा आरोप होत असून सर्वत्र भ्रष्टाचाराचा बोलबाला सुरु आला आहे. 

सत्ताधारी व विरोधी पक्षा बाबत संभ्रम 

महापालिकेत अपुरा अधिकारी, आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला बाहेर काढण्या ऐवजी सत्ताधारी व विरोधी पक्ष पालिकेला लुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आदी अनेक कारणाने शासन नियुक्त अधिकारी पालिकेत आले पाहिजे. असे कोणत्याही सत्ताधारी व विरोधी पक्षाचा नेता उघडउघड भूमिका घेत नसून त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.