शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

उल्हासनगर महापालिका आयक्तांच्या बदलीने प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:47 IST

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यात समीर उन्हाळे यांना आयुक्त पदावरुन हटवून आयएएस दर्जाच्या डॉ राजा धायनिधी यांची आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली. आयुक्तांच्या वारंवार बदलीने, महापालिकेतील प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढीस लागली असून स्थानिक नेते व प्रभारी अधिकारी गळ्यातगळे घालून भ्रष्टाचार करीत असल्याची सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असताना एका वर्षांपूर्वी सुधाकर देशमुख यांची आयुक्तपदी नियुक्त झाली. त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तब्बल २२ कोटीच्या विविध कामाच्या निविदा रद्द करून आवश्यक कामाला प्राधान्य दिले. तसेच कोरोना रुग्ण शेजारच्या शहरात वाढत असताना उल्हासनगर कोरोना मुक्त शहर ठेवण्यात त्यांना यश आले होते. मात्र अचानक सुधाकर देशमुख यांची गेल्या एका महिन्या पूर्वी बदली होऊन आयुक्त पदी समीर उन्हाळे यांची नियुक्ती झाली. उन्हाळे यांनी वाढत्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नवीन कोविड रुग्णालय स्थापन करून विविध विभागातील सावळागोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका महिन्यात त्यांची बदली होऊन डॉ राजा धायानिधी यांची नियुक्त झाली.

 महापालिकेचा एकूण कारभार बघता कोणताही अधिकारी येथे येण्यास तयार नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, ४ प्रभारी अधिकारी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम व वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, विधी अधिकारी, पालिका सचिव, नगररचनाकार आदी वर्ग १ व २ चे ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वच विभागाचा पदभार कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे असून विभागात सावळागोंधळ उडाला आहे. प्रभारी अधिकारी स्थानिक नेत्यांच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोप होत असून त्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मक्तेदारी निर्माण केली. अश्या अधिकाऱ्याची चौकशी अथवा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, चौकशी करू नये. असे ठराव महापालिकेत मंजूर झाले. असा आरोप होत असून सर्वत्र भ्रष्टाचाराचा बोलबाला सुरु आला आहे. 

सत्ताधारी व विरोधी पक्षा बाबत संभ्रम 

महापालिकेत अपुरा अधिकारी, आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला बाहेर काढण्या ऐवजी सत्ताधारी व विरोधी पक्ष पालिकेला लुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आदी अनेक कारणाने शासन नियुक्त अधिकारी पालिकेत आले पाहिजे. असे कोणत्याही सत्ताधारी व विरोधी पक्षाचा नेता उघडउघड भूमिका घेत नसून त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.