शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

खाबूगिरी प्रकरणांनंतर केडीएमसीत बदल्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग ...

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील २२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. त्यात कंत्राटी कामगार, वाहनचालक, सफाई कामगार, कामगार, शिपाई आदींचा समावेश आहे.

नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी भांगरे आणि मढवी यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. यात त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले होते. मनपात आतापर्यंत झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये बहुतांश अधिकारी हे प्रभाग अधिकारी आहेत. काही प्रकरणांमध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह त्यांचे कर्मचारीही पकडले गेले आहेत. सोमवारी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. त्यानंतर आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या ही बदल्या केल्या आहेत. त्यांच्याही प्रभागांतर्गत बदल्या केल्या आहेत. ई, फ, ब, ग, ह, अ, क, आय, ड, जे या सर्वच्या सर्व दहा प्रभागांमधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अदल्याबदल्यानंतर तरी खाबूगिरीच्या प्रकरणांना आळा बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-----------------

मनपा मुख्यालयाच्या चढले पायऱ्या

- प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार सूर्यवंशी हे सहायक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवतील, अशी अपेक्षा होती; परंतु सहायक आयुक्त अक्षय गुडधे वगळता प्रभागांमध्ये अदलाबदली झालेले सर्वच अधिकारी हे मूळचे वरिष्ठ लिपिक आणि उपलेखापाल आहेत.

- त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये २२१ जण असले तरी काही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या काही कामगारांना मात्र अभय दिल्याने कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्याही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आपली बदली अन्य प्रभागांमध्ये होऊ नये म्हणून काहींनी गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या पायऱ्याही चढल्याची सूत्रांची माहिती आहे.

---------------------------