शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
2
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
3
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
4
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
5
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
6
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
7
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
8
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
9
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
10
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
11
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
12
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
13
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
14
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
15
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
16
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
17
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
18
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
19
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
20
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खाबूगिरी प्रकरणांनंतर केडीएमसीत बदल्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग ...

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी यांना अटक झाल्यानंतर केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील २२१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. त्यात कंत्राटी कामगार, वाहनचालक, सफाई कामगार, कामगार, शिपाई आदींचा समावेश आहे.

नवीन बांधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी भांगरे आणि मढवी यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. यात त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले होते. मनपात आतापर्यंत झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये बहुतांश अधिकारी हे प्रभाग अधिकारी आहेत. काही प्रकरणांमध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह त्यांचे कर्मचारीही पकडले गेले आहेत. सोमवारी त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. त्यानंतर आता बेकायदा बांधकाम नियंत्रण व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या ही बदल्या केल्या आहेत. त्यांच्याही प्रभागांतर्गत बदल्या केल्या आहेत. ई, फ, ब, ग, ह, अ, क, आय, ड, जे या सर्वच्या सर्व दहा प्रभागांमधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अदल्याबदल्यानंतर तरी खाबूगिरीच्या प्रकरणांना आळा बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-----------------

मनपा मुख्यालयाच्या चढले पायऱ्या

- प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार सूर्यवंशी हे सहायक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवतील, अशी अपेक्षा होती; परंतु सहायक आयुक्त अक्षय गुडधे वगळता प्रभागांमध्ये अदलाबदली झालेले सर्वच अधिकारी हे मूळचे वरिष्ठ लिपिक आणि उपलेखापाल आहेत.

- त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये २२१ जण असले तरी काही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या काही कामगारांना मात्र अभय दिल्याने कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्याही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आपली बदली अन्य प्रभागांमध्ये होऊ नये म्हणून काहींनी गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या पायऱ्याही चढल्याची सूत्रांची माहिती आहे.

---------------------------