शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:03 IST

भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. विद्यार्थ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्वांची दखल घेत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी गोन्नाडे यांची बदली केली आहे.आलेल्या तक्रारींनंतर जिल्हा समाजकल्याण विभागाने गोन्नाडे यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर गोन्नाडे यांच्याकडे अतिरिक्त असलेला भिवंडीतील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील अतिरिक्त गृहपालपदाचा पदभार बुधवारी काढून घेतला. त्यांच्याऐवजी कल्याण येथील मागासवर्गीय मुलांच्या ( गुणवंत ) वसतिगृहाचे गृहपाल एस. एन. सातरले यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे.वसतिगृहात आठवी ते एमएस्सी तसेच एलएलबीचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहत असून वसतिगृहत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने अनेक विद्यार्थी हे वसतिगृह सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सध्या या वसतिगृहात १५ ते १७ विद्यार्थी राहत आहेत . विशेष म्हणजे या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे नांदेड, लातूर , सोलापूर, जळगाव, पुणे, जुन्नर ,चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आली आहेत. कमी विद्यार्थी असूनही या विद्यार्थ्यांना गृहपालांकडून सडलेली फळे, जास्त पाणी टाकलेले दूध, निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केला आहे. या संदर्भात गोन्नाडे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्र ारी केल्या होत्या.नियमांप्रमाणे मिळणार सुविधायापुढे सरकारी नियमांप्रमाणेच आम्हाला जेवण व इतर सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन आम्हाला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रि या विद्यार्थी इम्रान रेहमान मोमीन याने दिली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे