शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गृहपालांची बदली , विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:03 IST

भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. विद्यार्थ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्वांची दखल घेत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी गोन्नाडे यांची बदली केली आहे.आलेल्या तक्रारींनंतर जिल्हा समाजकल्याण विभागाने गोन्नाडे यांना चांगलेच धारेवर धरले होते. अखेर गोन्नाडे यांच्याकडे अतिरिक्त असलेला भिवंडीतील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील अतिरिक्त गृहपालपदाचा पदभार बुधवारी काढून घेतला. त्यांच्याऐवजी कल्याण येथील मागासवर्गीय मुलांच्या ( गुणवंत ) वसतिगृहाचे गृहपाल एस. एन. सातरले यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे.वसतिगृहात आठवी ते एमएस्सी तसेच एलएलबीचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहत असून वसतिगृहत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने अनेक विद्यार्थी हे वसतिगृह सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे सध्या या वसतिगृहात १५ ते १७ विद्यार्थी राहत आहेत . विशेष म्हणजे या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे नांदेड, लातूर , सोलापूर, जळगाव, पुणे, जुन्नर ,चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आली आहेत. कमी विद्यार्थी असूनही या विद्यार्थ्यांना गृहपालांकडून सडलेली फळे, जास्त पाणी टाकलेले दूध, निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केला आहे. या संदर्भात गोन्नाडे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्र ारी केल्या होत्या.नियमांप्रमाणे मिळणार सुविधायापुढे सरकारी नियमांप्रमाणेच आम्हाला जेवण व इतर सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन आम्हाला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रि या विद्यार्थी इम्रान रेहमान मोमीन याने दिली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे