शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

श्रावणात उपवासाच्या पदार्थांची रेलचेल; थाळीला खवय्यांची अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:14 IST

साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरीचा समावेश

ठाणे : श्रावण सुरू झाला की, खवय्यांसाठी उपवासाच्या खमंग पदार्थांची रेलचेल उपहारगृह, हॉटेलमध्ये सुरू होते. एरवी उपवासाच्या दिवशीच मिळणारे हे पदार्थ श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर मिळत असल्याने खवय्ये या पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये यंदा ठाणेकर खवय्यांनी या थाळीला अधिक पसंती दिली आहे. त्याचबरोबर उपवासाचे थालीपीठ आणि बटाटापुरीही फॉर्ममध्ये आहे.श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांसाठी खवय्ये खास उपहारगृहे किंवा मराठमोळी हॉटेल गाठतात. महिनाभर हे पदार्थ दररोज उपलब्ध असतील, असे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले. यात साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलाई मटका लस्सी, साबुदाणा खिचडी, वऱ्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ, मिसळ, कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल,भाजणी, थालीपीठ, कचोरी, साबुदाणा वडा, बटाटा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, खरवस, पुरी भाजी, इडली, स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पियुष तसेच, गोड पदार्थांमध्ये गुळाचा खरवस, दुधी हलवा यांसारखे विविध चवींचे, विविध प्रकारांचे पदार्थ श्रावण महिन्यात खास मेन्यू लिस्टमध्ये समाविष्ट केले जातात. उपवासाची थाळी यंदा खवय्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असल्याने त्याला अधिक मागणी आहे. यात पुरी बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, वरीच्या तांदळाचा भात, खीर, श्रीखंड या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ही थाळी १८० रुपये प्रमाणे मिळत आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ प्रत्यक्षात उपहारगृह किंवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी दुपारच्या वेळेस जास्त गर्दी असते, संध्याकाळच्या वेळेस पार्सल नेण्यावर खवय्यांचा भर असतो. गेल्यावर्षी उपवासाच्या पदार्थांचे दर वाढवले होते. यंदा दर स्थिरच ठेवण्यात आले असल्याचे जोशी यांनी सांगितले.पार्सलमध्ये खिचडी, मिसळ, थालीपीठ, कचोरी हे पदार्थ नेण्यावर खवय्यांचा भर असतो. श्रावणात नेहमीच्या साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, बटाटा - रताळ्याचे काप या नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्ये दुपारच्या वेळेस उपवासाच्या थाळीला पसंती देत आहेत.गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. उपहारगृहात दरवर्षी होणारी गर्दी यंदा १० ते १५ टक्क्यांनी ओसरली आहे. पाऊस कमी झाला की ही गर्दी वाढेल, अशी आशा उपहारगृह तसेच, हॉटेल मालक व्यक्त करीत आहेत.