शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:53 IST

पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे.

कल्याण : पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनीच पुढाकार घेऊन सोमवारी दगड, विटांचा चुरा टाकून खड्डा बुजविण्याचे काम केले.शहरातील जुना ऐतिहास पत्रीपूल पाडल्याने त्याला समांतर असलेल्या अरुंद रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी प्लास्टिकचे दुभाजक लावले आहेत. मात्र, त्यांचीही दूरवस्था झाली आहे. या पुलावरून नागरिक व प्रवासी, वाहनचालक दररोज वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे हैराण असलेल्या वाहनचालकांना आता पुलावरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.कल्याण-शीळ रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. मे महिन्यात महामंडळाने खड्डे बुजवले. मात्र, आता पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून, ते बुजविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मागच्या वर्षी खड्ड्यांमुळे कल्याण शहरात पाच जणांचा बळी गेला होता. त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका, एमआयडीसी, बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत होते. पालकमंत्र्यांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता रस्ता सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, असे ठणकावून सांगितले होते. आता पत्रीपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारानंतर तरी या सरकारी संस्थांना जाग येणार आहे का, असा सवाल केला जात आहे.>वाहतुकीमुळे काम करणे अवघडमहापालिका हद्दीतील सर्व रेल्वे उड्डाणपुलावर मास्टीक अस्फाल्टींग शीट बसविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र, पत्रीपुलावर मास्टीक अस्फाल्टींगचे काम करण्यासाठी जागाच नाही. तसेच सतत वाहतूक होत असल्याने येथे हे काम होऊ शकलेले नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणेने रात्रीच्या वेळी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुलावरून महापालिकेचे पदाधिकारी आलिशान गाड्यांतून प्रवास करतात. मात्र, त्यांना पुलावरील खड्डे दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.