शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे, वाहनचालकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:53 IST

पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे.

कल्याण : पावसामुळे पूर्वेतील पत्रीपुलावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनीच पुढाकार घेऊन सोमवारी दगड, विटांचा चुरा टाकून खड्डा बुजविण्याचे काम केले.शहरातील जुना ऐतिहास पत्रीपूल पाडल्याने त्याला समांतर असलेल्या अरुंद रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी प्लास्टिकचे दुभाजक लावले आहेत. मात्र, त्यांचीही दूरवस्था झाली आहे. या पुलावरून नागरिक व प्रवासी, वाहनचालक दररोज वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. त्यामुळे हैराण असलेल्या वाहनचालकांना आता पुलावरील खड्ड्यांचाही सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.कल्याण-शीळ रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. मे महिन्यात महामंडळाने खड्डे बुजवले. मात्र, आता पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून, ते बुजविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. मागच्या वर्षी खड्ड्यांमुळे कल्याण शहरात पाच जणांचा बळी गेला होता. त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका, एमआयडीसी, बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत होते. पालकमंत्र्यांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता रस्ता सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे, असे ठणकावून सांगितले होते. आता पत्रीपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारानंतर तरी या सरकारी संस्थांना जाग येणार आहे का, असा सवाल केला जात आहे.>वाहतुकीमुळे काम करणे अवघडमहापालिका हद्दीतील सर्व रेल्वे उड्डाणपुलावर मास्टीक अस्फाल्टींग शीट बसविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांनी सांगितले होते. मात्र, पत्रीपुलावर मास्टीक अस्फाल्टींगचे काम करण्यासाठी जागाच नाही. तसेच सतत वाहतूक होत असल्याने येथे हे काम होऊ शकलेले नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणेने रात्रीच्या वेळी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुलावरून महापालिकेचे पदाधिकारी आलिशान गाड्यांतून प्रवास करतात. मात्र, त्यांना पुलावरील खड्डे दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.