शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

ठप्प लोकलसेवेमुळे होतेय महामार्गावर वाहतूककोंडी; चाकरमान्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:16 IST

लाखोंच्या संख्येने वाहने रस्त्यांवर, प्रदूषणाच्या पातळीत वाढ

पारोळ : कोरोना महामारीमुळे साडेपाच महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प असल्याने सामान्य चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लाखोंनी प्रवासी एकट्या लोकलसेवेमुळे मुंबईत पोहोचवले जातात, मात्र साडेपाच महिन्यांपासून लोकलसेवा ठप्प असल्याने त्याचा भार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. लाखोंच्या संख्येने वाहने महामार्गावर येत असल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा ताण महामार्गावर येत आहे.

महामार्गावर नेहमीच होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कामावर ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची पुरती दमछाक होऊ लागली आहे. लोकलसेवा कधी सुरू होईल आणि चाकरमान्यांचा जीव कधी भांड्यात पडेल, याचा नेम नसल्याने चाकरमानी धास्तावला आहे. तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर उतरत असल्याने प्रदूषणाच्या पातळीतदेखील वाढ झाली आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा अद्याप ठप्पच आहे. सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांना एस.टी. महामंडळ आणि खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बºयाच कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले आहेत. त्यात खाजगी वाहनांनी लांबवरचा प्रवास करताना पगारातील मोठा हिस्सा प्रवासावरखर्च होतो. अशा वेळी उरलेल्या पगारात महिनाभर कुटुंबाचा खर्च भागवण्याची कसरत चाकरमान्यांना करावी लागत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याने नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. वाहनांच्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. सुरुवातीला कडक लॉकडाऊन असल्याने प्रदूषणाच्या पातळीचा थर खाली आला होता, मात्र लोकल सेवा ठप्प असल्याने आता पुन्हा वाहनांच्या प्रचंड ताणामुळे महामार्गावरील प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच दररोज होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे कोरोना संसर्गाचा धोकादेखील वाढला आहे. बरेचसे चाकरमानी आपल्याकडील दुचाकी, चारचाकीने मुंबईसारख्या ठिकाणी कामावर जातात. अशा वेळी कामावर लवकर पोहोचण्याच्या बेतात ही मंडळी मिळेल तसा शॉर्टकट मारतात आणि वाहतूककोंडीचे विघ्न वाढवून ठेवतात. महामार्गावरील वाढती प्रचंड वाहतूककोंडी अनेक समस्यांना आव्हान देणारी ठरली आहे.

सद्य:स्थितीत शासनाने लोकलसेवा ठप्पच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. कामाच्या ठिकाणी जाताना त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. लांबवरचा प्रवास असल्याने खर्चदेखील दुप्पट होतो. गंभीर आजाराच्या रुग्णांनादेखील अत्यावश्यक लोकलसेवेत प्रवेश नसल्याने त्यांच्या हालात भर पडत आहे. शासनाने निदान त्यांना तरी लोकलसेवेमध्ये प्रवेश द्यावा. तसेच शासनाला जितक्या लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करता येईल, तितके ते सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याचे राहील. तसेच कोरोनावर कधी लस विकसित होईल, ते निश्चित सांगता येत नाही. अशा काळात चाकरमानी बेरोजगार होऊ नये, यासाठी शासनाने वेळीच पावले उचलून लोकलसेवा सुरू केली पाहिजे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी