शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

प्रवाशांना फटका... मेगाब्लॉक आणि पावसाचाही

By admin | Updated: June 26, 2017 01:33 IST

ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजवल्याचे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक सहा तास बंद असल्याने पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेने जादा बस सोडण्याचे केलेले नियोजन फसले आणि रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लूट केली. त्या काळात पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सकाळी ९ ते दुपारी तीनपर्यंत धीम्या मार्गावरील आणि सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील, असे र्लेवने जाहीर केल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानकादरम्यान केडीएमटीच्या बस सोडण्याचे नियोजन होते. पण ते नेहमीप्रमाणे फसले. त्यामुळे रिक्षेचा आसरा घेण्यावाचून प्रवाशांकडे पर्याय उरला नाही. रात्रभर पाऊस पडत असल्याने आणि कळवा स्थानकादरम्यान रूळांत पाणी भरल्याने हा मेगाब्लॉक होणार की नाही, याबद्दल सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. पण पावसाचा आणि तुंबलेल्या पाण्याचा जोर ओसरू लागल्याने रेल्वेने ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. रविवार आणि पावसामुळे नेहमीपेक्षा कमी प्रवासी असले तरी पर्यायी वाहतुकीचे नियोजन कोलमडले. अंबरनाथहून-उल्हासनगर आणि उल्हासनगरहून कल्याणचे रिक्षाभाडे एरव्ही प्रत्येक प्रवाशासाठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जाते. त्यात काही ठिकाणी पाच रूपये जादा घेतले गेले. पण कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांनी टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीकडे जाण्यासाठी २०० ते ३०० रुपये भाड्याची वसूली केली. कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवलीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून शेअर भाडे २४ रुपये घेतले जाते. ते रविवारी ३० ते ५० रूपये उकळण्यात आले. कल्याण, डोंबिवली स्थानकात खूप कमी रिक्षा होत्या. त्यातच पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. प्रवाशांनी बससाठी कल्याण डेपोत गर्दी केली. तेथून सुटणारी प्रत्येक बस भरलेली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेकडून डोंबिवली ते कल्याणदरम्यान दहा विशेष बस चालविण्यात आल्या. ठाकुर्लीतील रेल्वे प्रवाशांची कल्याण किंवा डोंबिवली या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खूप तारांबळ झाली.