शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

प्रवाशांना फटका... मेगाब्लॉक आणि पावसाचाही

By admin | Updated: June 26, 2017 01:33 IST

ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजवल्याचे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक सहा तास बंद असल्याने पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेने जादा बस सोडण्याचे केलेले नियोजन फसले आणि रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लूट केली. त्या काळात पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सकाळी ९ ते दुपारी तीनपर्यंत धीम्या मार्गावरील आणि सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील, असे र्लेवने जाहीर केल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानकादरम्यान केडीएमटीच्या बस सोडण्याचे नियोजन होते. पण ते नेहमीप्रमाणे फसले. त्यामुळे रिक्षेचा आसरा घेण्यावाचून प्रवाशांकडे पर्याय उरला नाही. रात्रभर पाऊस पडत असल्याने आणि कळवा स्थानकादरम्यान रूळांत पाणी भरल्याने हा मेगाब्लॉक होणार की नाही, याबद्दल सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. पण पावसाचा आणि तुंबलेल्या पाण्याचा जोर ओसरू लागल्याने रेल्वेने ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. रविवार आणि पावसामुळे नेहमीपेक्षा कमी प्रवासी असले तरी पर्यायी वाहतुकीचे नियोजन कोलमडले. अंबरनाथहून-उल्हासनगर आणि उल्हासनगरहून कल्याणचे रिक्षाभाडे एरव्ही प्रत्येक प्रवाशासाठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जाते. त्यात काही ठिकाणी पाच रूपये जादा घेतले गेले. पण कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांनी टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीकडे जाण्यासाठी २०० ते ३०० रुपये भाड्याची वसूली केली. कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवलीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून शेअर भाडे २४ रुपये घेतले जाते. ते रविवारी ३० ते ५० रूपये उकळण्यात आले. कल्याण, डोंबिवली स्थानकात खूप कमी रिक्षा होत्या. त्यातच पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. प्रवाशांनी बससाठी कल्याण डेपोत गर्दी केली. तेथून सुटणारी प्रत्येक बस भरलेली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेकडून डोंबिवली ते कल्याणदरम्यान दहा विशेष बस चालविण्यात आल्या. ठाकुर्लीतील रेल्वे प्रवाशांची कल्याण किंवा डोंबिवली या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खूप तारांबळ झाली.