शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

वाहतूक नियंत्रण शाखेला मिळणार आणखी २० वॉर्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:15 IST

केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आणखी २० ट्रॅफिक वॉर्डन देण्याची मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेकडे केली होती.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आणखी २० ट्रॅफिक वॉर्डन देण्याची मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेकडे केली होती. महापालिकेच्या गुरुवारी पार झालेल्या महासभेत ही मागणी मंजूर करण्यात आली.ट्रॅफिक वॉर्डन देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता भाजप सदस्य राहुल दामले यांनी महापालिकेने यापूर्वी किती वॉर्डन नेमले आहेत? ते काम करत नसल्याने शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा. त्याशिवाय, नव्याने वॉर्डन नेमण्यास मंजुरी देऊ नये, असा मुद्दा मांडला. तसेच वॉर्डन नेमण्याचा जो हेतू होता, त्याला हरताळ फासला जात आहे. त्याचे कारण हे वॉर्डन वाहतूककोंडी दूर करण्याचे काम न करता अन्य ठिकाणी वसुली करण्याचे काम करतात. वाहतूक पोलिसांचे वॉर्डन हस्तक झाले आहेत, असा आरोप दामले यांनी केला आहे.वाहतूक नियंत्रणासाठी ज्या काही गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता असते, त्या गोष्टींसाठी महापालिका तत्पर असते. त्यानुसार, वाहतूक शाखेकडून जी काही मागणी केली जाते, त्याची पूर्तता केली जाते. जॅमर पुरविले जातात. मात्र, वाहतूक शाखा केवळ महापालिकेची मदत घेते. प्रत्यक्षात वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियंत्रणाचे काम केले जात नाही. जनतेच्या नाराजीला सदस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आधी नेमलेल्या वॉर्डनकडून काम केले जात नसताना नवीन वॉर्डन नेमण्याचे कारण काय? वॉर्डन नेमण्यास विरोध नसला तरी उद्देश साध्य केला जात नसल्यास वॉर्डनची नेमणूक कशासाठी करायची, असा सवाल दामले यांनी केला. दामले यांचा विरोध पाहता भाजप सदस्य शैलेश धात्रक म्हणाले, की दामले यांचा विरोध चुकीचा आहे. महापालिकेने नवीन २० वॉर्डनच्या नेमणुकीस मंजुरी द्यावी. त्यात विलंब करू नये. नवीन वॉर्डन डोंबिवली पश्चिमेत नेमावेत, अशी आग्रही मागणी केली. दामले यांना कोंडीचा त्रास होत नसल्याने त्यांचा या विषयाला विरोध असू शकतो, याकडे धात्रक यांनी लक्ष वेधले.दोन भाजप सदस्यांमधील वाद पाहता आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्टीकरण केले की, महापालिका हद्दीतील कोंडी दूर करण्यासाठी २० अतिरिक्त वॉर्डन नेमावेत, अशी मागणी वाहतूक नियंत्रण शाखेने केली आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर असल्याने या विषयाला स्थगिती देता येणार नाही. महापालिकेकडून वॉर्डन मिळत नसल्याने वाहतूककोंडीचे कारण वाहतूक शाखेकडून सांगितले जाते. त्यामुळे हा विषय मंजूर करणे गरजेचे आहे.यावेळी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत १२ वॉर्डन नेमण्यासाठी वर्षाला १२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. एका वॉर्डनला पाच हजार रुपये मानधन दिले जाते. २० वॉर्डन नेमल्यास त्यांच्या मानधनापोटी वर्षाला १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो महापालिकेस करावा लागणार आहे. यापूर्वी महापालिकेने ७५ वॉर्डन नेमले आहेत. त्यात आणखी २० वॉर्डनची भर पडणार आहे. त्यामुळे नव्याने वॉर्डनची संख्या ९५ होणार आहे. वाहतूक शाखेकडे पोलीस बळाची कमतरता आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची मदत घेतली जाते.>पुढील महासभेत अहवाल सादर करादामले यांचा विरोध पाहता महापौर विनीता राणे यांनी सांगितले की, विषयाचे गांभीर्य पाहता हा विषय मंजूर केला जात आहे. मात्र, पुढील महासभेत प्रशासनाने यापूर्वी नेमलेले ७५ वॉर्डन कुठे नेमलेले आहेत. ते काय करतात, याचा तपशिलासह अहवाल सादर करावा, असे सूचित केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका