शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात वाहतूक कोंडी, नागरिक हैराण; व्यापाऱ्यांची मनमानी व रस्ते खोदल्याचा परिणाम

By सदानंद नाईक | Updated: April 29, 2024 19:22 IST

महापालिकेने रस्ते पुनर्बांधणी व गटारीचे कामे वेळेत करून फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे

सदानंद नाईक, उल्हासनगर: रस्ते पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत रस्ते खोदणे, फुटपाथवर अतिक्रमण आदींच्या परिणामामुळे शहरात वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने रस्ते पुनर्बांधणी व गटारीचे कामे वेळेत करून फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता सोडल्यास बहुतांश रस्ते अरुंद आहेत. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी शहराच्या नशिबी असून महापालिका व वाहतूक पोलीस विभाग हतबल झाले. शहरातील वर्दळीचे व गर्दीचे ठिकाण असलेले नेहरू चौक, शिरू चौक, मुख्य बाजारपेठा आदी ठिकाणच्या रस्ते फुटपाथवर दुकानदार अतिक्रमण करून साहित्य विक्रीला ठेवत आहेत. तर दुकानासमोरील फुटपाथच्या पुढे ग्राहकांना दुकानात येण्या-जाण्यासाठी सर्रासपणे लोखंडी जाळी लावली जाते. तसेच रस्त्याच्या एका नव्हेतर, दोन्ही बाजूला बाईकची पार्किंग केली जाते. यावर महापालिकेनें व वाहतूक विभागाने कारवाईचा हातोडा उगरताच व्यापारी वर्ग आंदोलन करते. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे वाहतूक विभागाची टोइंग गाडी बंद झाली आहे.

 शहरातील कुर्ला कॅम्प रस्ता, कैलास कॉलनी रस्ता, गायकवाड पाडा रस्ता, व्हीनस ते नेताजी चौक रस्ता, तहसील कार्यालय रस्ता, डॉल्फिन रस्ता, श्रीराम चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता, उल्हासनगर ते मुख्य मार्केट रस्ता यासह इतर ठिकाणी भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदले असून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच गेल्या एका वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले नाही. याव्यतिरिक्त व्यापारी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका सभागृहात पोलीस वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक बोलावून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे सुचविले होते. चौकट वाहतूक बाबत शिस्त हवी...आयुक्त अजीज शेख वाहतूक पोलीस विभागाची टोइंग गाडी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडली असून ती सुरू होण्याची गरज आहे. असे मत आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले आहे. तसेच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारवा लग्नात असेल. असे मत आयुक्तांनी व्यक्त केली आहे।

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीulhasnagarउल्हासनगर