शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात वाहतूक कोंडी, नागरिक हैराण; व्यापाऱ्यांची मनमानी व रस्ते खोदल्याचा परिणाम

By सदानंद नाईक | Updated: April 29, 2024 19:22 IST

महापालिकेने रस्ते पुनर्बांधणी व गटारीचे कामे वेळेत करून फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे

सदानंद नाईक, उल्हासनगर: रस्ते पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत रस्ते खोदणे, फुटपाथवर अतिक्रमण आदींच्या परिणामामुळे शहरात वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने रस्ते पुनर्बांधणी व गटारीचे कामे वेळेत करून फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता सोडल्यास बहुतांश रस्ते अरुंद आहेत. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी शहराच्या नशिबी असून महापालिका व वाहतूक पोलीस विभाग हतबल झाले. शहरातील वर्दळीचे व गर्दीचे ठिकाण असलेले नेहरू चौक, शिरू चौक, मुख्य बाजारपेठा आदी ठिकाणच्या रस्ते फुटपाथवर दुकानदार अतिक्रमण करून साहित्य विक्रीला ठेवत आहेत. तर दुकानासमोरील फुटपाथच्या पुढे ग्राहकांना दुकानात येण्या-जाण्यासाठी सर्रासपणे लोखंडी जाळी लावली जाते. तसेच रस्त्याच्या एका नव्हेतर, दोन्ही बाजूला बाईकची पार्किंग केली जाते. यावर महापालिकेनें व वाहतूक विभागाने कारवाईचा हातोडा उगरताच व्यापारी वर्ग आंदोलन करते. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे वाहतूक विभागाची टोइंग गाडी बंद झाली आहे.

 शहरातील कुर्ला कॅम्प रस्ता, कैलास कॉलनी रस्ता, गायकवाड पाडा रस्ता, व्हीनस ते नेताजी चौक रस्ता, तहसील कार्यालय रस्ता, डॉल्फिन रस्ता, श्रीराम चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता, उल्हासनगर ते मुख्य मार्केट रस्ता यासह इतर ठिकाणी भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदले असून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तसेच गेल्या एका वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले नाही. याव्यतिरिक्त व्यापारी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका सभागृहात पोलीस वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक बोलावून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे सुचविले होते. चौकट वाहतूक बाबत शिस्त हवी...आयुक्त अजीज शेख वाहतूक पोलीस विभागाची टोइंग गाडी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडली असून ती सुरू होण्याची गरज आहे. असे मत आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले आहे. तसेच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारवा लग्नात असेल. असे मत आयुक्तांनी व्यक्त केली आहे।

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीulhasnagarउल्हासनगर