शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले त्रस्त; चालणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

वाहतूक पोलीस गायब, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडी : भिवंडी परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंजारपट्टीनाका ते कल्याण रोड, धामणकरनाका येथे रिक्षातून जाण्यासाठी तासभर लागतो.

मंडई, नझराना, शांतीनगर, भंडारी चौक, अंजूरफाटा, मिरॅकल मॉल, कोटरगेट मशीद आदी विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात रोजच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यांमध्ये पडून बंद पडत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारही घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व महापालिका प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याने शहरातील विविध भागांत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर व चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचेरिक्षाचालक आनंद दिघे चौक, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅण्ड चौक, वंजारपट्टीनाका, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, मंडई, धामणकरनाका, कासारआळी, ठाणगेआळी, पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तहसील कार्यालय, अशोकनगर, कल्याण रोड, अंजूरफाटा, धामणकरनाका, भादवडनाका, गौरीपाडा, पारनाका, ब्राह्मणआळी, नझराना रोड आदी ठिकाणी रोज कोंडी होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी