शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले त्रस्त; चालणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

वाहतूक पोलीस गायब, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडी : भिवंडी परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंजारपट्टीनाका ते कल्याण रोड, धामणकरनाका येथे रिक्षातून जाण्यासाठी तासभर लागतो.

मंडई, नझराना, शांतीनगर, भंडारी चौक, अंजूरफाटा, मिरॅकल मॉल, कोटरगेट मशीद आदी विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात रोजच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यांमध्ये पडून बंद पडत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारही घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व महापालिका प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याने शहरातील विविध भागांत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर व चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचेरिक्षाचालक आनंद दिघे चौक, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅण्ड चौक, वंजारपट्टीनाका, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, मंडई, धामणकरनाका, कासारआळी, ठाणगेआळी, पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तहसील कार्यालय, अशोकनगर, कल्याण रोड, अंजूरफाटा, धामणकरनाका, भादवडनाका, गौरीपाडा, पारनाका, ब्राह्मणआळी, नझराना रोड आदी ठिकाणी रोज कोंडी होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी