शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले त्रस्त; चालणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

वाहतूक पोलीस गायब, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडी : भिवंडी परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंजारपट्टीनाका ते कल्याण रोड, धामणकरनाका येथे रिक्षातून जाण्यासाठी तासभर लागतो.

मंडई, नझराना, शांतीनगर, भंडारी चौक, अंजूरफाटा, मिरॅकल मॉल, कोटरगेट मशीद आदी विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात रोजच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यांमध्ये पडून बंद पडत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारही घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व महापालिका प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याने शहरातील विविध भागांत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर व चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचेरिक्षाचालक आनंद दिघे चौक, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅण्ड चौक, वंजारपट्टीनाका, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, मंडई, धामणकरनाका, कासारआळी, ठाणगेआळी, पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तहसील कार्यालय, अशोकनगर, कल्याण रोड, अंजूरफाटा, धामणकरनाका, भादवडनाका, गौरीपाडा, पारनाका, ब्राह्मणआळी, नझराना रोड आदी ठिकाणी रोज कोंडी होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी