शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:38 AM

घोडबंदरसह खारेगाव टोलनाक्यावर ट्रक बंद : साचलेल्या पाण्यानेही ठाणेकरांचे हाल

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर आणि भिवंडी-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी घोडबंदर भागातील आनंदनगर येथे वळणावर ट्रक बंद पडल्याने ठाण्याच्या दिशेने आणि पुढे घोडबंदरकडे जाणारी अशी दोन्ही बाजूंची वाहतूक तब्बल दीड ते दोन तास ठप्प झाली होती. ही कोंडी सुटत नाही, तोच खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासात दोन ट्रक बंद झाल्याने नाशिकच्या दिशेने जाताना माजिवड्यापर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून ठिकठिकाणी आणि उड्डाणपुलांवरसुद्धा खड्डे पडले असल्याने वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.

शुक्रवारची सकाळ घोडबंदरकरांना वाहतूककोंडीची ठरली. सध्या या भागात मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यात या कोंडीने घोडबंदरकरांची आणखी डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८ च्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने जात असलेला ट्रक आनंदनगर येथे वळण घेत असताना त्याच ठिकाणी बंद पडला. त्यामुळे घोडबंदरकडे जाणारी आणि घोडबंदरवरून ठाण्याच्या दिशेने येणारी अशा दोन्ही मार्गिका ठप्प झाल्या. त्यानंतर, बुस्टरच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात आला. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना ११ वाजले. भरपावसात अंगावर रेनकोट घालून ते ठिकठिकाणी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. परंतु, तरीसुद्धा ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनाही तीन तासांची पराकाष्ठा करावी लागली. या मार्गावरील रस्त्यावर, उड्डाणपुलावर आणि सेवारस्त्यांवर खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेही वाहतूककोंडीत अधिकची भर पडलेली दिसून आली.या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असताना दुसरीकडे भिवंडी-नाशिक महामार्गावर माजिवड्याच्या दिशेने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. त्यामुळे भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरही वाहतूक जॅम झाली होती. खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासाच्या कालावधीत दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. तसेच पुढे मानकोली येथे या महामार्गावर खड्डे असल्याने आणि साकेत पुलावरही ते पडल्याने कोंडीत आणखीनच भर पडली. त्यात अवजड वाहनांची वाहतूकही याच कालावधीत घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणाºया महामार्गावर आल्याने वाहतूककोंडी आणखीन वाढली. ऐन कामावर जाण्याच्या वेळेसच सकाळी या तीन घटना टप्प्याटप्प्याने घडल्याने कामावर जाणाºया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.काँगे्रसने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणच्ठाणे : स्मार्ट सिटीचे स्वप्न बघणाºया ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर परिसरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.च्महापालिकेतील निद्रीस्त सत्ताधाऱ्यांना खड्ड्यांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशिष गिरी यांनी आनंदनगर येथील सेवारस्त्यावर वृक्षलागवड करून आणि स्मार्ट रांगोळ्या काढून ठाणे महापालिकेविरोधात निदर्शने करून अनोखे आंदोलन केले.रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरूअसलेले काम, खड्ड्यांमुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग आणि त्यात घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यांवर वाहने बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली आहे.- अमित काळे, पोलीसउपायुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी