शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

वाहतूक शाखेचा दूरध्वनी ‘डेड’

By admin | Updated: March 23, 2017 01:21 IST

पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न

डोंबिवली : पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. कोंडी व बेशिस्त वाहनचालकांबाबत तक्रार करायची झाल्यास संपर्क साधायचा कुठे, असा यक्षप्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, दूरध्वनी नेमका कशामुळे बंद आहे, याचीही कल्पना तेथील अधिकाऱ्यांना नाही. त्यावर, तातडीने पत्रव्यवहार करून माहिती घेतली जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.केडीएमसी आणि वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजन, यामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल यंत्रणेचा अभाव याबरोबरच बेशिस्त वाहनचालक यामुळे कोंडीत भर पडत आहे. वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होत नसल्याने मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. रिक्षाचालकाने होमगार्ड महिलेला केलेल्या मारहाणीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.वाहतूक शाखेतील दूरध्वनी बंद असल्यामुळे नागरिकांना संपर्क साधण्यास अडचण येत आहे. वाहतूकव्यवस्था, कोंडी, बेशिस्त वाहनचालक याबाबत तक्रार करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी जाहीर करून तक्रारीसंदर्भात थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जात होती. परंतु, सध्या हे चित्र पाहावयास मिळत नाही. दरम्यान, ८०० रुपयांच्या आसपास बिल थकल्याने दूरध्वनी बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)