शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

वाहतूक शाखेचा दूरध्वनी ‘डेड’

By admin | Updated: March 23, 2017 01:21 IST

पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न

डोंबिवली : पूर्वेतील वाहतूक नियंत्रण शाखेतील दूरध्वनी बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. सध्या शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. कोंडी व बेशिस्त वाहनचालकांबाबत तक्रार करायची झाल्यास संपर्क साधायचा कुठे, असा यक्षप्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, दूरध्वनी नेमका कशामुळे बंद आहे, याचीही कल्पना तेथील अधिकाऱ्यांना नाही. त्यावर, तातडीने पत्रव्यवहार करून माहिती घेतली जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.केडीएमसी आणि वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजन, यामुळे शहरातील वाहतूकव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल यंत्रणेचा अभाव याबरोबरच बेशिस्त वाहनचालक यामुळे कोंडीत भर पडत आहे. वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होत नसल्याने मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. रिक्षाचालकाने होमगार्ड महिलेला केलेल्या मारहाणीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.वाहतूक शाखेतील दूरध्वनी बंद असल्यामुळे नागरिकांना संपर्क साधण्यास अडचण येत आहे. वाहतूकव्यवस्था, कोंडी, बेशिस्त वाहनचालक याबाबत तक्रार करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी जाहीर करून तक्रारीसंदर्भात थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जात होती. परंतु, सध्या हे चित्र पाहावयास मिळत नाही. दरम्यान, ८०० रुपयांच्या आसपास बिल थकल्याने दूरध्वनी बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)