शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, ...

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, तर इतर दुकाने दुपारी चार वाजताच बंद करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल करतानाच व्यापाऱ्यांनी दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी शहरातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही, तर निर्बंध झुगारून दुकाने चारनंतर पुढे उघडीच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्राच्या भूमिकेमुळे किमान एक आठवडा तरी राज्यातील निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील व्यापाऱ्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. आता ठाण्यातील व्यापाऱ्यांना निर्बंधांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून, व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठाण्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली असून, भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरू झाली आहे; मात्र व्यापाऱ्यांनाच दुकाने चार वाजल्यानंतर बंद करण्याची सक्ती केली जात आहे, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बँकांचे हप्ते, कामगारांचे पगार, घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. आता तर काही व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता कायद्याचे उल्लंघन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली असून, तशी वेळ येऊ देऊ नका, असा इशाराच व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

नौपाडा व्यापारी मंडळ, ठाणे व्यापारी संघ, ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोशिएशन, कळवा सराफ असोशिएशन आणि एकता लाँड्री असोसिएशन या सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

............

"आतापर्यंत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले; मात्र आता व्यापाऱ्यांची सहनशक्ती संपली असून, व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले असून, आमच्याकडे आता कायद्याचे उल्लंघन करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही."

- मितेश शाह, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ

...........

वाचली