शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, ...

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाद्यपदार्थांची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असतात, तर इतर दुकाने दुपारी चार वाजताच बंद करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल करतानाच व्यापाऱ्यांनी दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी शहरातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही, तर निर्बंध झुगारून दुकाने चारनंतर पुढे उघडीच ठेवणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्राच्या भूमिकेमुळे किमान एक आठवडा तरी राज्यातील निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील व्यापाऱ्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. आता ठाण्यातील व्यापाऱ्यांना निर्बंधांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून, व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठाण्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली असून, भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरू झाली आहे; मात्र व्यापाऱ्यांनाच दुकाने चार वाजल्यानंतर बंद करण्याची सक्ती केली जात आहे, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बँकांचे हप्ते, कामगारांचे पगार, घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. आता तर काही व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता कायद्याचे उल्लंघन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली असून, तशी वेळ येऊ देऊ नका, असा इशाराच व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

नौपाडा व्यापारी मंडळ, ठाणे व्यापारी संघ, ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोशिएशन, कळवा सराफ असोशिएशन आणि एकता लाँड्री असोसिएशन या सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

............

"आतापर्यंत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले; मात्र आता व्यापाऱ्यांची सहनशक्ती संपली असून, व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. व्यापाऱ्यांना जगणे कठीण झाले असून, आमच्याकडे आता कायद्याचे उल्लंघन करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही."

- मितेश शाह, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ

...........

वाचली