शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचा सोईस्करपणे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केडीएमसीने घालून दिलेल्या निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रात्री ८ नंतर अत्यावश्यक ...

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केडीएमसीने घालून दिलेल्या निर्बंधांकडे व्यापाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही डोंबिवलीतील काही भागांमध्ये सर्रासपणे दुकाने खुली ठेवून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. विशेषत: रेल्वे स्थानक परिसरात हे चित्र दिसून येत आहे.

कल्याण-डोंबिवलीत दररोज हजाराच्या आसपास रुग्णसंख्या आढळून येत असल्याने नव्या रुग्णांना उपचारासाठी बेड मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मनपा हद्दीत वाढलेला कोरोना पाहता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांची गर्दी टाळावी, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत डोंबिवलीत ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन करून आदेश प्रशासनाला मागे घेण्यास भाग पाडले. याआधी आयुक्तांनी दुकाने रात्री ८ नंतर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचेही योग्य प्रकारे पालन व्यापाऱ्यांकडून होत नाही. आदेशाचे पालन होते का, हे पाहण्यासाठी कल्याणमध्ये सूर्यवंशी तर डोंबिवलीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. यात त्यांना बहुतांश दुकाने ८ नंतर सुरू असल्याचे निदर्शनास पडले होते. आजही हेच चित्र सर्रासपणे दिसत असून रात्री ८ नंतर दुकाने बंद करण्याच्या नियमांचे व्यापाऱ्यांकडून उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळते.

लोकप्रतिनिधींचा पाठिंबा व्यापाऱ्यांना मिळत असल्याने ते प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याची चर्चा असून, अशावेळी स्थानिक पोलिसांची बोटचेपी भूमिकाही व्यापाऱ्यांच्या वृत्तीला एकप्रकारे पाठबळ देणारी ठरत आहे. शनिवारी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात तास चाललेल्या आंदोलनाच्या वेळीही पोलिसांनी घेतलेली नरमाईची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. अखेर प्रभाग अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

--------------

गस्त वाढविण्याची मागणी

महापालिका कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्यानंतर रात्रीच्या वेळेत खाद्यपदार्थाच्या हातगाड्या बिनदिककतपणे रस्त्यावर लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढून सोशल डिस्टिन्संगचा फज्जा उडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना पत्र पाठवून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. रात्री ८ नंतरही सुरू असलेल्या दुकानदारांवरही कारवाई करावी, याकडे लक्ष वेधले आहे.

--------------------