शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

डाळींची 'मर्यादित साठवणूक'‌ निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 20:43 IST

यापुढे धान्य घाऊक विक्रेत्यांना डाळींचा २०० टनाचा व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच टन डाळींचा साठा करता येईल, अश्या मर्यादित साठवणुकीचा निर्णय केंद्र ‌शासनाने नुकताच जारी केला आहे.

- सुरेश लोखंडे

 ठाणे - यापुढे धान्य घाऊक विक्रेत्यांना डाळींचा २०० टनाचा व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच टन डाळींचा साठा करता येईल, अश्या मर्यादित साठवणुकीचा निर्णय केंद्र ‌शासनाने नुकताच जारी केला आहे. यामुळे या डाळीं विक्रेत्या व्यापार्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्राच्या या मनमानी निर्णया विरोधात देशपातळीवर आंदोलन छेडण्याचा प्रयत्न आहे, असे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राज्याचे उपाध्यक्ष व ठाणे जिल्हा घाऊक व्यापारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांनी लोकमतला सांगितले

 डाळींच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या या मर्यादेची २ जुलैची अधिसूचना मनमानी आणि देशातील व्यापार्यांवर अन्याय करणारी असून विशेष म्हणजे सरकारच्या स्वत: च्या धोरणाचे उल्लंघन करणारी देखील आहे, असे सुतोवाच ठक्कर यांनी केले. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्याकडे हा मुद्दाही अखिल भारतीय व्यापारी महासंघने (कँट) निवेदनाद्वारे उपस्थित करून जारी केलेली अधिसूचना मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र अद्यापही हालचाली दिसून येत नसल्याचे ठक्कर यांनी सांगितले.

 केंद्राने जारी केलेली अधिसूचना भेदभाव करणारी आहे आणि देशातील डाळींच्या व्यापारातील सामान्य व्यवसाय पद्धतीविरूद्ध आहे. कोणताही धोरणात्मक मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या ' भागधारकांना विश्वासात घेण्याच्या सल्ल्याचा' सरळ उल्लंघन करणारी अधिसूचना असल्याचे ठक्कर,यांनी स्पष्ट केले. देशातील सुमारे 5 लाख लोक अप्रत्यक्षपणे रोजीरोटी मिळवणार्या या डाळींचे देशात वार्षिक उत्पादन 256 लाख टन आहे. या  डाळींची आयात सुमारे 20 लाख टन आहे. एका अधिसूचनेद्वारे सरकारने डाळी, मसूर, हरभरा, तूर, उडद, मूग आणि काबली हरभरा या डाळींच्या साठ्याची मर्यादा व्यापारी पोर्टलवर अपलोड केली जाईल, असे आधीच बंधनकारक केले आहे. त्यांचे पालन होत असताना आता या डाळींच्या साठवणुकीला मर्यादा केली असल्याचे ठक्कर यांनी सांगितले.

 गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये सरकारने स्पष्टपणे जाहीर केले होते की 'जेव्हा डाळांच्या किंमती एमएसपीपेक्षा शुन्य टक्के जास्त असतील किंवा देशात आपत्कालीन परिस्थिती असेल तेव्हाच आवश्यक वस्तू कायदा किंवा देशात आपत्कालीन परिस्थिती असेल तेव्हाच आवश्यक वस्तू कायदा किंवा स्टॉक मर्यादा लागू होईल' असे नमुद केलेले आहे. पण सरकारच्या या घोषणेचा धिक्कार करीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2 जुलैला एक अधिसूचना जारी केली. त्यात म्हटले होते की ' घाऊक विक्रेते 200 टन डाळी साठवू शकतात आणि त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या डाळींचा साठा करता येतो, असे नमुद केले आहे. पण आता काढलेल्या अधिसूचनेत डाळीं साठवण्यावर मर्यादा घातल्याने व्यापार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :MarketबाजारCentral Governmentकेंद्र सरकार