शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

उल्हासनगरात व्यापारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आमने-सामने

By सदानंद नाईक | Updated: March 4, 2023 17:28 IST

उल्हासनगर : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या साहित्यावर शुक्रवारी कारवाई केली. या ...

उल्हासनगर : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या साहित्यावर शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईवरून व्यापारी व विभागाचे कर्मचारी आमने-सामने येऊन धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने, महापालिका कारवाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

उल्हासनगरातील बहुतांश मार्केट परिसरात दुकानदार रस्त्याच्या फुटपाथवर विक्रीसाठी साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना फुटपाथ ऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिक्रमण पथक रस्त्याच्या फुटपाथवर दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या साहित्यावर कारवाई करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहर पश्चिम मध्ये अशीच कारवाई अतिक्रमण पथकाने केली. तर शुक्रवारी कॅम्प नं-५ येथील मार्केट मध्ये कारवाई सुरू केली. या कारवाईने व्यापारी मध्ये रोष व्यक्त होऊन त्यांनी अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका अतिक्रमण पथकातील कर्मचारी दादागिरीने साहित्य उचलत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही.

 महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी व्यापारी व अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यात तू तू मैं मैं झाल्याची कबुली दिली. मात्र व्यापाऱ्यांनी नंतर याप्रकरणी माफी मागितल्याने, गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती दिली. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा शिंपी यांनी दिली. मुख्य मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी दुकानाच्या व थेट फुटपाथच्या समोर लोखंडी जाळी सर्रासपणे लावण्यात येत आहे. या लोखंडी जाळीवर महापालिका अतिक्रमण पथकाने कारवाई केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकाली लागणार असल्याची प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली. महापालिका अतिक्रमण पथकाच्या कारवाई पाठोपाठ रस्त्याच्या फुटपाथवर पुन्हा दुकानदार साहित्य ठेवत असल्याचे चित्र शहरात आहे. याबाबत महापालिकेने विचार करण्याची गरज असल्याचे मत मनसेने व्यक्त केले.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर