शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

अंबरनाथच्या मलंगगड परिसरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुशिवली गावाजवळील नदीत ...

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुशिवली गावाजवळील नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी येथे जीवघेणी गर्दी केल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे मनाई आदेशसुद्धा जारी केले आहेत. मात्र तरीही पर्यटक नदी, धबधबे अशा ठिकाणी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून फक्त विकेंडला नाकाबंदी आणि गस्त ठेवली जाते. त्यामुळे इतरदिवशी पर्यटनस्थळी पर्यटक मोठी जीवघेणी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात कुशिवली गावाजवळ असलेल्या नदीत पर्यटकांनी अशीच तुफान गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही अशापद्धतीने पर्यटनस्थळी गर्दी होत असेल, तर कोरोना फक्त विकेंडलाच होतो का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.