शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सदाबहार येऊर ठरतेय पर्यटकांचे आकर्षण!

By admin | Updated: May 22, 2017 01:59 IST

ठा णे शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला येऊरचा हा रम्य परिसर शिवाईनगर आणि उपवन या भागाला लागूनच आहे

- जितेंद्र कालेकर, ठाणेठा णे शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला येऊरचा हा रम्य परिसर शिवाईनगर आणि उपवन या भागाला लागूनच आहे. जैववैविधतेने नटलेल्या या जंगल भागात वन्य प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पतींचे वैभव आहे. पर्यटन आणि पे्रक्षणीय शांत निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे येऊर हे आदिवासींपासून धनदांडग्यांचेही आकर्षण ठरले आहे. जंगलाच्या मधोमधच वनविभागाला लागून येऊर आणि चेन्ना ही दोन महसुली गावे आहेत. या गावाचा परिसर हा ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येत असल्याचा तसेच आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत या परिसरात अनेक श्रीमंतांनी त्यांच्या जागा बळकावून त्याठिकाणी अलिशान बंगले उभारले. या परिसरात सर्व सुविधा असलेले असे सुमारे ३०० बंगले आणि हॉटेल्स आहेत. त्यातील बऱ्याच अनधिकृत बंगल्यावर ठाणे महापालिका आणि वनविभागाने कारवाई केली आहे. आदिवासींच्या जागा ९९ वर्षांच्या लीजवर घेतल्या आहेत. तर काहींनी फसवणुकीने जादा पैशाचे आमिष दाखवत खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पर्यटनापेक्षा रात्रीच्या पाटर्या, लग्न समारंभानिमित्त होणारे हळदीचे कार्यक्रम तसेच वेगवेगळया निमित्ताने होणाऱ्या पाटर्यांसाठीच येऊरची ओळख अधोरेखित होऊ लागली. दोन वर्षांपूर्वी तर एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पोलीस, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क खडबडून जागे झाले. याठिकाणी जाण्यासाठी अनेक निर्बंध आणले. मूळात, येऊरचे जंगल हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे त्याची राखीव वनक्षेत्रात गणना होते. तिथे असणाऱ्या वन्यप्राणी आणि पक्षांना मुक्त संचार करता यावा म्हणून सायंकाळनंतर त्याठिकाणी आवाजाला आणि नागरिकांना वावरण्यासाठी आधीच बंदी आहे. त्यात अनेक गैर प्रकार वाढल्यामुळे वनविभागाने अनेक अतिक्रमणे हटवली. शिवाय, ३१ डिसेंबर, गटारी आणि होळीनिमित्त रंगणाऱ्या ओल्या पाटर्यांवर निर्बंध आली आहेत. रात्रीच्यावेळी येथील जंगलात बिबटयासह अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरु असतो. इथे रंगणाऱ्या पाटर्यां, वाहनांच्या हॉर्नमुळे आणि डीजेमुळे होणारे कर्णकर्कश आवाज तसेच धांगडधिंग्यामुळे वन्यप्राण्यांना मात्र त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. येऊरच्या प्रवेशद्वारावरच वाहनांची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो. अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई तसेच पाचशे ते पाच हजारापर्यंतचा दंडही वनविभागाकडून वसूल केला जातो. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरही याठिकाणी कारवाई केली जाते. येऊर गावातील रहिवासी वगळून अन्य पर्यटक किंवा नागरिकांना शुल्क आकारूनच सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान प्रवेश दिला जातो. रात्री ११ नंतर मात्र पर्यटकांनाही आत सोडले जात नाही. या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे वनक्षेत्रापासून १०० मीटरच्या आत बांधकामास राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी आवश्यक केली आहे. येथील वनसंपदा टिकून राहण्यासाठी हे निर्बंध हे रहिवासी मान्य करतात. वनसंपदा टिकून राहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे, अशी माफक अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.‘ओडीके’ आणि नवरंग येऊरचे पाहुणे...येऊरच्या या जंगलात दक्षिण भारतातून ओरियंटा द्वारफ किंगफिश (ओडीके) हा पाहुणा पक्षी खास प्रजननासाठी येतो. साधारण जूनमध्ये त्याचे आगमन होते. सप्टेंबर मध्ये आपल्या पिलांसह तो परत जातो.पिक्टा अर्थात नवरंग हा पक्षीही मध्यप्रदेशातून केवळ उन्हाळयाच्या हंगामात येतो. साधारण, एप्रिल मध्ये येणारा हा नवरंग येऊरचा पाहूणचार घेतल्यानंतर जून, जुलै मध्ये आपल्या मुळ ठिकाणी जातो.बिबटयांचा मुक्त वावर...१बिबटया हा अत्यंत गुढ वर्तन असलेला प्राणी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अन्न साखळीमध्ये तो उच्चस्थानी आहे. हे उद्यान मानवी वस्तीतलगत असूनही मानव आणि प्राणी संघर्ष अल्प प्रमाणात आहे. २स्वयंसेवी संस्था आणि वनविभागामार्फत बिबटयापासून संरक्षण कसे करावे, याबाबत वेगवेगळया प्रकारे जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे वनअधिकारी सांगतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी (सायंकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत ) त्याच्या हालचाली मोठया प्रमाणात असल्याचे आढळते. ३या काळात स्थानिक रहिवाशांनी आणि पर्यटकांनी बाहेर जाणे टाळावे. बिबटया हा त्याच्या उंचीचे सावज हेरतो. त्यामुळे शौचालयाला उघडयावर जाऊ नये. तसेच लहान मुलांना बाहेर पाठवू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात येते. त्याचा उपयोग होऊ लागला आहे.