शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:47 IST

मंगळवारी रात्रभरात १६९ मिमी पाऊस : झाडे उन्मळून पडली, ठिकठिकाणी झाली वाहतूककोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली तर बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ मिमी पाऊस झाला. पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले, तीन ठिकाणी वृक्ष तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. सांयकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. परंतु हवामान खात्याने २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २२ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात पाऊस बरसण्यास सुरवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी बरसत होत्या. मात्र रात्री १२ नंतर पावसाने दमदार हजेरी लावली. रात्री ११.३० ते १२.३० या एका तासात ४५.४७ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री १ ते २.३० या काळात ४१.१५ मिमी पाऊस पडला. पहाटे साडेतीननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पहाटे ५.३० ते ६.३० या कालावधीत केवळ ५.५९ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ८.३० पर्यंत १६९.१८ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी दिवसभर अनेक शहरांत सूर्यदर्शन झाले नव्हते. ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ४३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ठाणे शहरात ३५९९ मिमी पाऊस झाला असून मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३१९.९१ मिमी पाऊस झाला होता. मंगळवारीरात्री पडलेल्या पावसामुळे कळवा स्टेशन जवळील ‘सत्यम शिवम सुदंरम’ इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या गटारे तुडूंब भरली होती. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी नालेसफाई केली की, नाही, असा प्रश्न केला जात आहे. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तीन ठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी सांयकाळी समुद्राला भरती असल्याने ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार होत्या.ठाण्यात ठिकठिकाणी साचले पाणी : मुसळधार पावसामुळे बुधवारी शहरात ठिकठिकाणी पाणी साचून वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. पाणी तुंबल्याचे प्रकार शहरात जवळपास दहा ठिकाणी झाले. धोधो पाऊस आल्याने पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पाणी रस्त्यांवर तुंबले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीही झाली. ठाण्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा दरवर्षी पालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी हा दावा फोल असल्याचे सिद्ध होते. कोरोना काळातही लोकांकडून कराची अपेक्षा करणाऱ्या महानगरपालिकेने अशा मुलभूत समस्यांपासून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यापार्श्वभूमीवर होत आहे.पावसाने उभेपीक केले उद्ध्वस्त... अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांगरूळ, शिरवली आदी ग्रामीण भागात बहरून आलेले भातपीक कापणीच्या आधीच पावसाने पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.