शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दरवाढीमुळे टोमॅटो झाले लालबुंद!

By admin | Updated: July 6, 2017 06:18 IST

पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले असून त्यातील टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. पंधरवड्यापूर्वी २० ते ३० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर ८० रूपये किलोवर गेले आहेत. टोमॅटोबरोबरच कोथिंबीर, फ्लॉवर, मिरची, वांगी या भाज्याही महागड्या टोपलीत बसल्या आहेत. गेल्या आठवडाभरात मंडईत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, दर वाढत गेले आहेत. अनेक भाज्या ८० रुपयांच्या पुढेच आहेत. आठवडाभरापूर्वी स्वस्त दरात मिळणारा टोमॅटो अचानक महाग होत गेल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाज्यांमधील अविभाज्य घटक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते. परंतु त्यांच्या दराने तोंडचे पाणी पळवल्याची महिलांची भावना आहे. मिरचीचे दर देखील दुपटीने वाढले आहेत. कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीने दरातच शतक ओलांडले आहे. फ्लॉवर, वांगीही महाग झाले असून वाटाणा तर अडीचशे रुपये किलोवर पोचला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने भाज्या कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे दर वाढल्याचे भाजी विक्रेते गणेश गायकवाड यांनी सांगितले. हे दर दोन आठवड्यांनी घसरतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. वाढत्या दरामुळे स्वाभाविकपणे खरेदीही घटली आहे. जास्तीत जास्त पाव किलो भाजी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.