शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार : बालेकिल्ला कोणाचा

By admin | Updated: November 2, 2015 01:55 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांपासून फारकत घेतलेल्या भाजप-शिवसेनेसह आघाडी आणि मनसे, बविआ, रासप, बसपा, एमआयएम, अपक्ष आदींच्या उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदान रविवारी पार पडले

अनिकेत घमंडी, डोंबिवलीस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांपासून फारकत घेतलेल्या भाजप-शिवसेनेसह आघाडी आणि मनसे, बविआ, रासप, बसपा, एमआयएम, अपक्ष आदींच्या उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदान रविवारी पार पडले. अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले. प्रचाराच्या शुभारंभापासूनच आरोप - प्रत्यारोपांसह ‘पंजे’, जबडे काढण्यात आणि शेवटच्या रात्रीत गोळीबारासह तलवारी नाचवण्यापर्यंत मजल गेली. असे असले तरीही खऱ्या अर्थाने ही निवडणूक केवळ भाजप-सेना यांच्यातच लढली गेली. गेल्या काही वर्षातील ‘युती’चा बालेकिल्ला म्हणवला जाणारा हा गड नेमका ‘सेनेचा’, ‘भाजप’चा की अन्य कुणाचा हे देखिल सोमवारच्या निकालात स्पष्ट होईल. तसेच संघ परिवार नेमका कोणाच्या बाजूने उभा राहतो हे वास्तव समोर येणार आहे. सकाळी ९.३० वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने ‘चिकन सूप’-बटाटे वडे काढले तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘संघाची अर्धी चड्डी’ असा उल्लेख केला होता. त्याचे परिणाम या दोन्ही पक्षांना या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराच्या पराभवाच्या रुपाने भोगावे लागले. विधानसभेतही या दोन्ही पक्षांना या ठिकाणी सपाटून मार खावा लागला. काही ठिकाणी मनसे उमेदवाराचे तर डिपॉझीटही जप्त झाले. लोकसभेत युतीचा तर विधानसभेत कल्याण ग्रामीण वगळता सर्व ठिकाणी भाजपसह (सहयोगी) अपक्ष आमदार विजयी झाले होते. तेव्हापासूनच केडीएमसीच्या निवडणुकीतही स्वतंत्र लढण्याचा सेना-भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला होता, झालेही तसेच. साधारणत: पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच युतीत दरी निर्माण झाली असून ते स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळेच संपूर्ण प्रचार हा केवळ या दोन पक्षांभोवतीच झाला. ११७ प्रभागांमधून एकूण ७८९ उमेदवार उभे असून या निवडणुकीत भाजपने दाखवलेले स्मार्ट सिटीचे स्वप्न, शिवसेनेची वचनपूर्ती, तर मनसेच्या नाशिक पॅटर्नपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी मुंबई पॅटर्न आणि काँग्रेसचा जाहिरनामा हा फिका पडल्याचे दिसून आले. सुरुवातीला केवळ विकासाच्या मुद्याभोवती फिरणाऱ्या प्रचारात नंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा डागण्यात आल्या, त्यानंतर दोन्ही पक्षांचे वाद विकोपाला गेले आणि थेट पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. ‘संघ- परिवार’, ब्राह्मण मते, जातीय समीकरणे, नेत्यांचे वैयक्तिक वाद, पक्षांतर्गत धुसफूस ही देखिल या निमित्ताने चव्हाट्यावर आली. मुख्यमंत्र्यांची संघ स्वयंसेवक-पदाधिकाऱ्यांसोबतची स्वतंत्र बैठक, प्रचाराच्या शेवटच्या घटकेपर्यंत येथे येणे, मार्गदर्शन करणे, शिवसनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही येथे ठाण मांडणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याचे नाट्य, शुक्रवारच्या मध्यरात्रीतील जीवघेण्या मारामाऱ्या, हल्ले, जमाव बंदी धाब्यावर बसवणे, पक्षश्रेष्ठींचे महापालिका क्षेत्रात मुक्त संचार या सर्व घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यात प्रचंड चर्चेची ठरली. स्थानिक समस्यांची चर्चा करतांना, राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे चर्चेला गेल्याने नागरिकांच्या पचनी फारसा हा प्रचार पडला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना एकेरी शब्दांत बोलणे, त्याचा त्यांनीही भर सभेत समाचार घेणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकास्त्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांची टिंगल, महागाईवर टीका, अच्छे दिनवर टीका, याखेरीज २० वर्षे होऊनही सत्ताधाऱ्यांनी या शहरांना काही न देता कसे बकाल केले या मुद्यांवरच भर देत प्रचार रंगला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यासह शुक्रवार - शनिवारमध्ये एकमेकांना थेट आव्हाने देण्यासह, हाणामाऱ्या, बंदुका काढण्यापर्यंत उमेदवारांची मजल गेली. त्यामुळे सोमवारचा निवडणूक निकाल हा खऱ्या अर्थाने स्थानिक उमेदवारांसह या दोन्ही पक्षांमध्ये ‘शक्ती परीक्षा’च असणार आहे.