शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये आज शिवस्वराज्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

ठाणे : येथील जिल्हा परिषदेत कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समिती कार्यालयांत आणि जिल्ह्यातील सर्व ...

ठाणे : येथील जिल्हा परिषदेत कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समिती कार्यालयांत आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ९ वा. येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात येणार आहे.

राज्यभर प्रथमत:च हा कार्यक्रम एवढ्या भव्य स्वरुपात होत आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे जि. प., पं. स. व ग्रा. पं. स्तरावर नियोजनाच्या दृष्टीने पूर्वतयारी बैठक घेऊन त्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्येदेखील उत्साहाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम करताना शासनाने कोविड-१९ चे निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत, राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन राहावे म्हणून महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्तेही झाले. तो हा शुभदिन होय.