शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शिवभोजन योजनेला सुरुवात, सात केंद्रांवर आजपासून १० रुपयांची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:03 IST

शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

ठाणे : शिवभोजन योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारपासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यात सात केंद्रांवर ही योजना कार्यान्वित होणार असून याठिकाणी दररोज ६७५ थाळ्यांचे प्रायोगिक तत्त्वावर वाटप केले जाणार आहे. या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. ठाण्यातील एका केंद्रावर या योजनेचा पालकमंत्र्यांच्या तर इतर केंद्रांवर तेथील आमदारांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असल्याने योजनेचा जास्तीतजास्त गरीब व गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी हे केंद्र उभे राहणार आहे, त्याठिकाणाचे शिधावाटप विभाग, महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली असून तेथेच केंद्र सुरू होणार आहे. जागा व शासनाच्या नियमावलीनुसार व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर केंद्रांची निवड केली गेली आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात सात केंद्रे सुरू होत आहे. यामध्ये भिवंडीत-२, नवी मुंबई, भार्इंदर, कळवा येथे प्रत्येकी एका आणि ठाणे शहरात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यातील लोकमान्य, पाडा नंबर-२ येथे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.तेराशे थाळ्यांचे जिल्ह्याला टार्गेट असल्याने त्याच्यासाठी १३ केंदे्र जिल्ह्यात उभी राहण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीस सात केंदे्र सुरू होत आहेत. उर्वरित केंदे्र लवकरच सुरू होतील. या केंद्रांवर थाळीचा स्वाद घेणाऱ्यांची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये फोटो आणि मोबाइल नंबर घेतला जाणार असून त्याद्वारे थाळ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. - नरेश वंजारी,उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे

टॅग्स :thaneठाणे