शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवभोजन योजनेला सुरुवात, सात केंद्रांवर आजपासून १० रुपयांची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:03 IST

शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

ठाणे : शिवभोजन योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारपासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यात सात केंद्रांवर ही योजना कार्यान्वित होणार असून याठिकाणी दररोज ६७५ थाळ्यांचे प्रायोगिक तत्त्वावर वाटप केले जाणार आहे. या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. ठाण्यातील एका केंद्रावर या योजनेचा पालकमंत्र्यांच्या तर इतर केंद्रांवर तेथील आमदारांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असल्याने योजनेचा जास्तीतजास्त गरीब व गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी हे केंद्र उभे राहणार आहे, त्याठिकाणाचे शिधावाटप विभाग, महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली असून तेथेच केंद्र सुरू होणार आहे. जागा व शासनाच्या नियमावलीनुसार व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर केंद्रांची निवड केली गेली आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात सात केंद्रे सुरू होत आहे. यामध्ये भिवंडीत-२, नवी मुंबई, भार्इंदर, कळवा येथे प्रत्येकी एका आणि ठाणे शहरात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यातील लोकमान्य, पाडा नंबर-२ येथे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.तेराशे थाळ्यांचे जिल्ह्याला टार्गेट असल्याने त्याच्यासाठी १३ केंदे्र जिल्ह्यात उभी राहण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीस सात केंदे्र सुरू होत आहेत. उर्वरित केंदे्र लवकरच सुरू होतील. या केंद्रांवर थाळीचा स्वाद घेणाऱ्यांची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये फोटो आणि मोबाइल नंबर घेतला जाणार असून त्याद्वारे थाळ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. - नरेश वंजारी,उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे

टॅग्स :thaneठाणे