शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बंडोबांसह अपक्षांची आज होणार मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:51 IST

अर्ज माघारीचा दिवस : छाननीनंतर ७५ जण रिंगणात

ठाणे : लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतून ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली होती. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. आता उर्वरित ७५ जण रिंगणात आहेत. यातील प्रमुख पक्षांचे बंडखोर व अपक्ष उमेदवार यांनी १२ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यातून किती जणांकडून उमेदवारी मागे घेतली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले असता, त्यातून चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले. आता दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह या ठाणे मतदारसंघात अन्य नोंदणीकृत पक्षांचे १४ उमेदवार आणि अपक्ष ११ आदी २५ उमेदवार शिल्लक आहेत. यातून मते खाणाऱ्या अपक्षांसह पक्षातून बंडखोरी करणाºया उमेदवारांची मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यासाठी काहींना लक्ष्मीदर्शनाचे आमिषही दाखवले जात आहे. यामध्ये किती यश मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे. याप्रमाणेच कल्याणमध्ये ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले आहेत. तरीदेखील या मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह नोंदणीकृत पक्षांचे २२ उमेदवार आहेत. याशिवाय, १२ अपक्ष आहेत. यातील किती उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिवंडीतही मुख्य लढत होणाºया दोन पक्षांसह नोंदणीकृत पक्षांचे १२ आणि १० अपक्षांची उमेदवारी होती. त्यातील चार अवैध ठरले आहेत. आता या १८ उमेदवारांपैकी भिवंडीतून किती जण उमेदवारी मागे घेणार, यासाठी चाचपणी सुरू आहे. यात बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या बंडखोरांचा समावेश आहे.कल्याण मतदारसंघातून दोघांची माघारकल्याण लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी दोघा उमेदवारांनी माघार घेतली. यापूर्वी बुधवारी एकूण दाखल झालेल्या ३६ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात चौघांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, रिंगणात किती उमेदवार राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे.देवेंद्र सिंह आणि सुरेश पाल अशी माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. सिंह हे भाजपचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज चर्चेचा विषय ठरला होता. अखेर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या भेटीनंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय सिंह यांनी घेतला. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.