शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बंडोबांसह अपक्षांची आज होणार मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:51 IST

अर्ज माघारीचा दिवस : छाननीनंतर ७५ जण रिंगणात

ठाणे : लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतून ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली होती. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. आता उर्वरित ७५ जण रिंगणात आहेत. यातील प्रमुख पक्षांचे बंडखोर व अपक्ष उमेदवार यांनी १२ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यातून किती जणांकडून उमेदवारी मागे घेतली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले असता, त्यातून चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले. आता दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह या ठाणे मतदारसंघात अन्य नोंदणीकृत पक्षांचे १४ उमेदवार आणि अपक्ष ११ आदी २५ उमेदवार शिल्लक आहेत. यातून मते खाणाऱ्या अपक्षांसह पक्षातून बंडखोरी करणाºया उमेदवारांची मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यासाठी काहींना लक्ष्मीदर्शनाचे आमिषही दाखवले जात आहे. यामध्ये किती यश मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे. याप्रमाणेच कल्याणमध्ये ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले आहेत. तरीदेखील या मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह नोंदणीकृत पक्षांचे २२ उमेदवार आहेत. याशिवाय, १२ अपक्ष आहेत. यातील किती उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिवंडीतही मुख्य लढत होणाºया दोन पक्षांसह नोंदणीकृत पक्षांचे १२ आणि १० अपक्षांची उमेदवारी होती. त्यातील चार अवैध ठरले आहेत. आता या १८ उमेदवारांपैकी भिवंडीतून किती जण उमेदवारी मागे घेणार, यासाठी चाचपणी सुरू आहे. यात बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या बंडखोरांचा समावेश आहे.कल्याण मतदारसंघातून दोघांची माघारकल्याण लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी दोघा उमेदवारांनी माघार घेतली. यापूर्वी बुधवारी एकूण दाखल झालेल्या ३६ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात चौघांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, रिंगणात किती उमेदवार राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे.देवेंद्र सिंह आणि सुरेश पाल अशी माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. सिंह हे भाजपचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज चर्चेचा विषय ठरला होता. अखेर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या भेटीनंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय सिंह यांनी घेतला. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.