शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बंडोबांसह अपक्षांची आज होणार मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:51 IST

अर्ज माघारीचा दिवस : छाननीनंतर ७५ जण रिंगणात

ठाणे : लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतून ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली होती. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. आता उर्वरित ७५ जण रिंगणात आहेत. यातील प्रमुख पक्षांचे बंडखोर व अपक्ष उमेदवार यांनी १२ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यातून किती जणांकडून उमेदवारी मागे घेतली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले असता, त्यातून चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले. आता दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह या ठाणे मतदारसंघात अन्य नोंदणीकृत पक्षांचे १४ उमेदवार आणि अपक्ष ११ आदी २५ उमेदवार शिल्लक आहेत. यातून मते खाणाऱ्या अपक्षांसह पक्षातून बंडखोरी करणाºया उमेदवारांची मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यासाठी काहींना लक्ष्मीदर्शनाचे आमिषही दाखवले जात आहे. यामध्ये किती यश मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे. याप्रमाणेच कल्याणमध्ये ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले आहेत. तरीदेखील या मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह नोंदणीकृत पक्षांचे २२ उमेदवार आहेत. याशिवाय, १२ अपक्ष आहेत. यातील किती उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिवंडीतही मुख्य लढत होणाºया दोन पक्षांसह नोंदणीकृत पक्षांचे १२ आणि १० अपक्षांची उमेदवारी होती. त्यातील चार अवैध ठरले आहेत. आता या १८ उमेदवारांपैकी भिवंडीतून किती जण उमेदवारी मागे घेणार, यासाठी चाचपणी सुरू आहे. यात बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या बंडखोरांचा समावेश आहे.कल्याण मतदारसंघातून दोघांची माघारकल्याण लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी दोघा उमेदवारांनी माघार घेतली. यापूर्वी बुधवारी एकूण दाखल झालेल्या ३६ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात चौघांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, रिंगणात किती उमेदवार राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे.देवेंद्र सिंह आणि सुरेश पाल अशी माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. सिंह हे भाजपचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज चर्चेचा विषय ठरला होता. अखेर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या भेटीनंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय सिंह यांनी घेतला. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.