शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी शिक्षण व रोजगारावर भर देणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

By धीरज परब | Updated: December 7, 2022 18:56 IST

७५ खोल्यां मध्ये ३३० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे . या शिवाय  बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स साठी हॉल, भोजन कक्ष आदी सुविधा आहेत .

मीरारोड - आदिवासी बांधवाना चांगले शिक्षण व रोजगार देण्यावर शासनाचा भर असून त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मीरारोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वस्ती गृहाच्या उदघाटन प्रसंगी दिली . 

काशीमीराच्या मुन्शी कंपाउंड मध्ये शासनाच्या जागेत २० कोटी खर्च करून आदिवासी मुला - मुलीं साठी शासकीय वसतिगृह आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याने उभारण्यात आले आहे .   तळ अधिक ३ मजली इमारत असून ४९ हजार फुटांचे बांधकाम आहे.  ७५ खोल्यां मध्ये ३३० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे . या शिवाय  बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स साठी हॉल, भोजन कक्ष आदी सुविधा आहेत .  मंगळवारी उदघाटन वेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित , खासदार राजेंद्र गावित , आमदार प्रताप सरनाईक व  गीता जैन, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , आयुक्त दिलीप ढोले , माजी नगरसेवक राजू भोईर , कमलेश भोईर , विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते. मंत्री गावित यांनी वसतिगृहची पाहणी करून काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या . 

यावेळी मंत्री गावित म्हणाले कि ,  आदिवासीं विविध वस्तू बनवतात त्या खरेदी करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेईल. आदिवासींचे वनपट्टे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे . आदिवासींच्या मूलभूत समस्या दूर करण्यासह शिक्षण व रोजगार साठी प्राधान्य दिले जात आहे . 

आदिवासींसाठी शिक्षण क्षेत्रात खूप काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या आश्रम शाळाच्या नव्याने अद्यावत इमारती बांधण्याची गरज आहे.  प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात वसतिगृह निर्माण व्हावे . शिक्षण झाल्यानंतर नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी मोठ्या शहरांच्या परिसरात तरी व पुरुषां साठी स्वतंत्र हॉस्टेल शासनाने उभारण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली.

 खासदार राजेंद्र गावित म्हणाले की,  राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मुंबईत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.  गरीब प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहाचा फायदा होणार आहे. 

आपल्या मतदार संघातील आदिवासी बांधव व पाड्यांचा विकास करण्यासाठी विविध कामे व निधीची मंजुरी मिळाली आहे . आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु झाल्याने यातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन ते व त्यांचे कुटुंब प्रगत होतील याचा आनंद मोठा असल्याचे आ. सरनाईक म्हणाले .  

टॅग्स :Mumbaiमुंबई