शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी शिक्षण व रोजगारावर भर देणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

By धीरज परब | Updated: December 7, 2022 18:56 IST

७५ खोल्यां मध्ये ३३० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे . या शिवाय  बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स साठी हॉल, भोजन कक्ष आदी सुविधा आहेत .

मीरारोड - आदिवासी बांधवाना चांगले शिक्षण व रोजगार देण्यावर शासनाचा भर असून त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मीरारोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वस्ती गृहाच्या उदघाटन प्रसंगी दिली . 

काशीमीराच्या मुन्शी कंपाउंड मध्ये शासनाच्या जागेत २० कोटी खर्च करून आदिवासी मुला - मुलीं साठी शासकीय वसतिगृह आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याने उभारण्यात आले आहे .   तळ अधिक ३ मजली इमारत असून ४९ हजार फुटांचे बांधकाम आहे.  ७५ खोल्यां मध्ये ३३० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे . या शिवाय  बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स साठी हॉल, भोजन कक्ष आदी सुविधा आहेत .  मंगळवारी उदघाटन वेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित , खासदार राजेंद्र गावित , आमदार प्रताप सरनाईक व  गीता जैन, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , आयुक्त दिलीप ढोले , माजी नगरसेवक राजू भोईर , कमलेश भोईर , विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते. मंत्री गावित यांनी वसतिगृहची पाहणी करून काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या . 

यावेळी मंत्री गावित म्हणाले कि ,  आदिवासीं विविध वस्तू बनवतात त्या खरेदी करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेईल. आदिवासींचे वनपट्टे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे . आदिवासींच्या मूलभूत समस्या दूर करण्यासह शिक्षण व रोजगार साठी प्राधान्य दिले जात आहे . 

आदिवासींसाठी शिक्षण क्षेत्रात खूप काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या आश्रम शाळाच्या नव्याने अद्यावत इमारती बांधण्याची गरज आहे.  प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात वसतिगृह निर्माण व्हावे . शिक्षण झाल्यानंतर नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी मोठ्या शहरांच्या परिसरात तरी व पुरुषां साठी स्वतंत्र हॉस्टेल शासनाने उभारण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली.

 खासदार राजेंद्र गावित म्हणाले की,  राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मुंबईत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.  गरीब प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहाचा फायदा होणार आहे. 

आपल्या मतदार संघातील आदिवासी बांधव व पाड्यांचा विकास करण्यासाठी विविध कामे व निधीची मंजुरी मिळाली आहे . आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु झाल्याने यातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन ते व त्यांचे कुटुंब प्रगत होतील याचा आनंद मोठा असल्याचे आ. सरनाईक म्हणाले .  

टॅग्स :Mumbaiमुंबई