शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

खासगीकरण ठरले टीएमटीचे मारेकरी!

By admin | Updated: December 21, 2015 01:17 IST

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल, असा त्यांचा उद्देश होता. परंतु, आज ते हयात नसताना त्यांच्या या स्वप्नाला सत्ताधारी शिवसेनेसह निष्क्रिय प्रशासनाने हरताळ फासला आहे. परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, पालिकेने केलेले हे प्रयत्न परिवहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे असफल ठरले. त्यामुळेच २६ वर्षांनंतरही ही सेवा ठाणेकरांच्या पसंतीस उतरू शकलेली नाही.ठाणे परिवहनची सेवा १९८९ मध्ये सुरू झाली तेव्हा सेवेत प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांच्या मर्जीतील लोकांची भरती केली गेली. अपेक्षेपेक्षा जास्त भरती केली गेली. काहींना तर कार्यशाळेचे ज्ञानही नसताना केवळ राजकीय दबावामुळे प्रवेश मिळाला. आजही ही मंडळी परिवहन सेवेत काम करीत आहेत. त्यामुळे या सेवेचे तीनतेरा वाजले. राजकीय मंडळींनी या सेवेच्या माध्यमातून आपली पोळी भाजण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू ठेवले आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३१३ बस असल्या तरी रस्त्यावर प्रत्यक्षात १३० च्या आसपास बस धावतात. परिवहनचे उत्पन्न कोलमडले असून प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परंतु, याला जबाबदार कोण, असा जर सवाल उपस्थित झाला तर प्रशासन आणि राजकीय मंडळी हेच जबाबदार आहेत. राजकीय राड्यामुळेच मागील तीन वर्षांपासून परिवहन समितीविनाच कारभार सुरू आहे. ही समिती सहा महिन्यांकरिता लोकशाही आघाडीच्या ताब्यात जाण्याच्या वेळेस जे राजकीय नाट्य घडले, त्यानंतर आजपर्यंत परिवहन समितीची घडी बसू शकलेली नाही. ही समिती आपल्या ताब्यातून जाऊ नये, असे सत्ताधारी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. याच भीतीने ही समिती रखडली आहे.परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, हे प्रयत्नही सपशेल अपयशी ठरले. जेएनएनयूआरएमअंतर्गत परिवहनने यापूर्वी २०० बस घेतल्या. यातील १०० हून अधिक बस आज किरकोळ दुरुस्तीसाठी परिवहनच्या आगारात धूळखात पडल्या आहेत. ज्या बसचे आयुर्मान संपुष्टात आले आहे, त्या बस रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी, ठेकेदारांची रखडलेली देणी, सीएनजीची रखडलेली देणी यामुळे परिवहन सेवा आज मेटाकुटीला आली आहे. केवळ परिवहनचा पाहणी दौरा आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सेवा सुधारण्याचे आदेश दिले जातात. स्थायी, महासभेच्या माध्यमातूनदेखील अनेक वेळा परिवहन सुधारण्यासाठी आश्वासनांची खैरात केली गेली. त्याचे पुढे काय झाले, ती आश्वासने पूर्ण करण्यात अडथळे कोण आणतो, याची उत्तरे प्रशासन आणि राजकीय मंडळींनी स्वत: आरशात पाहिले तर मिळतील. जाणूनबुजून परिवहन सेवा सक्षम करायची नाही, असा विडाच राजकीय नेते व प्रशासनाने उचलला आहे.