शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

खासगीकरण ठरले टीएमटीचे मारेकरी!

By admin | Updated: December 21, 2015 01:17 IST

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल, असा त्यांचा उद्देश होता. परंतु, आज ते हयात नसताना त्यांच्या या स्वप्नाला सत्ताधारी शिवसेनेसह निष्क्रिय प्रशासनाने हरताळ फासला आहे. परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, पालिकेने केलेले हे प्रयत्न परिवहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे असफल ठरले. त्यामुळेच २६ वर्षांनंतरही ही सेवा ठाणेकरांच्या पसंतीस उतरू शकलेली नाही.ठाणे परिवहनची सेवा १९८९ मध्ये सुरू झाली तेव्हा सेवेत प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांच्या मर्जीतील लोकांची भरती केली गेली. अपेक्षेपेक्षा जास्त भरती केली गेली. काहींना तर कार्यशाळेचे ज्ञानही नसताना केवळ राजकीय दबावामुळे प्रवेश मिळाला. आजही ही मंडळी परिवहन सेवेत काम करीत आहेत. त्यामुळे या सेवेचे तीनतेरा वाजले. राजकीय मंडळींनी या सेवेच्या माध्यमातून आपली पोळी भाजण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू ठेवले आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३१३ बस असल्या तरी रस्त्यावर प्रत्यक्षात १३० च्या आसपास बस धावतात. परिवहनचे उत्पन्न कोलमडले असून प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परंतु, याला जबाबदार कोण, असा जर सवाल उपस्थित झाला तर प्रशासन आणि राजकीय मंडळी हेच जबाबदार आहेत. राजकीय राड्यामुळेच मागील तीन वर्षांपासून परिवहन समितीविनाच कारभार सुरू आहे. ही समिती सहा महिन्यांकरिता लोकशाही आघाडीच्या ताब्यात जाण्याच्या वेळेस जे राजकीय नाट्य घडले, त्यानंतर आजपर्यंत परिवहन समितीची घडी बसू शकलेली नाही. ही समिती आपल्या ताब्यातून जाऊ नये, असे सत्ताधारी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. याच भीतीने ही समिती रखडली आहे.परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, हे प्रयत्नही सपशेल अपयशी ठरले. जेएनएनयूआरएमअंतर्गत परिवहनने यापूर्वी २०० बस घेतल्या. यातील १०० हून अधिक बस आज किरकोळ दुरुस्तीसाठी परिवहनच्या आगारात धूळखात पडल्या आहेत. ज्या बसचे आयुर्मान संपुष्टात आले आहे, त्या बस रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी, ठेकेदारांची रखडलेली देणी, सीएनजीची रखडलेली देणी यामुळे परिवहन सेवा आज मेटाकुटीला आली आहे. केवळ परिवहनचा पाहणी दौरा आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सेवा सुधारण्याचे आदेश दिले जातात. स्थायी, महासभेच्या माध्यमातूनदेखील अनेक वेळा परिवहन सुधारण्यासाठी आश्वासनांची खैरात केली गेली. त्याचे पुढे काय झाले, ती आश्वासने पूर्ण करण्यात अडथळे कोण आणतो, याची उत्तरे प्रशासन आणि राजकीय मंडळींनी स्वत: आरशात पाहिले तर मिळतील. जाणूनबुजून परिवहन सेवा सक्षम करायची नाही, असा विडाच राजकीय नेते व प्रशासनाने उचलला आहे.