शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

दिवा रेल्वेस्टेशन ते वाशी रेल्वेस्टेशन टीएमटी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवा ...

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवा रेल्वेस्टेशन ते वाशी रेल्वेस्टेशन अशी मार्ग क्रमांक १४१ ही बससेवा सुरू केली आहे. २१ मार्चपासून सुरू झालेल्या या बससेवेचा फायदा निश्चित दिवा परिसरातील नागरिकांना होणार आहे.

या बससेवेचे उद्घाटन परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, शैलेश पाटील आदी उपस्थित होते.

दिवा रेल्वे स्टेशनपूर्व ते वाशी रेल्वेस्टेशन या मार्गावर पहिली बस सकाळी ६.५० वाजता तर शेवटची बस ८.१५ वाजता आहे. जनतेच्या सुविधेसाठी एनजी रिजन्सी (बाळकूम) ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक ८३ एकूण १२ बसफेऱ्या दिल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक (भिवंडी) मार्ग क्र. ८४ वर एकूण बस फेऱ्या २० असून या मार्गावर पहिला बस सकाळी ७ वाजता व शेवटची बस १० वाजता सुटणार आहे.

गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडानाका) ते राजनोलीनाका/ कल्याण बायपास मार्ग क्र. ८६ वर एकूण बस फेऱ्या ८ देण्यात आल्या असून या मार्गावर पहिली बस सकाळी ८.२० वाजता तर शेवटची बस रात्री ८.५५ वाजता आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या बससेवा सुरू केल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्या वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही जोशी यांनी नमूद केले.