शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टीएमटीची भाजपाला धडक, शिवसेनेचा दणदणीत विजय, दोघे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:51 IST

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली. सर्वच्या सर्व ३७ उमेदवार निवडून आल्याने विरोधकांची धूळधाण उडाली. यंदा या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत होते. कामगारांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळवूनही त्या पक्षाला सपाटून मार खावा लागला.एव्हढेच नव्हे, तर शरद रावप्रणित युनियनलाच्या प्रगती पॅनेललाही कामगारांनी पसंती दिली नाही आणि शिवसेनेच्या हाती सरसकट सत्ता दिली. या निवडणुकीत दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.ठाणे परिवहन सेवेच्या एम्प्लॉईज युनियनच्या ३७ जागांसाठी शनिवारी शांततेत मतदान प्रक्रि या पार पडली. १,८८९ मतदारांपैकी १,७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.५० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे दाखवून दिले. आमदार संजय केळकर यांच्यासह वेगवेगळे पदाधिकारी उतरले होते. शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केला. आगारापासून कामगारांच्या प्रश्नांपर्यंत अनेक आश्वासने देण्यात आली. त्यामुळे व्यवस्थेच्या दृष्टीने खिळखिळी झालेली टीएमटी निवडणुकीच्या टॉनिकने मात्र ताजीतवानी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या या हालचालींमुळे प्रथमच शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्या पक्षाचेही नेते पूर्ण ताकद लावत निवडणुकीत उतरले. एकंदरीतच या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत गेली. भाजपाने ३७ पैकी ३० , शिवसेनेने ३७ तसेच शरद रावप्रणित संघटनेच्या प्रगती पॅनलचे २२ उमेदवार रिंगणात उतरले होते .मतदान पार पडल्यावर शनिवारी सायंकाळी लगेचच मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून धर्मवीर पॅनलने घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. मध्यरात्री एकच्या सुमारास निकाल हाती आला आणि शिवसेनेने एकहाती गड राखल्याचे स्पष्ट झाले.धर्मवीर पॅनलचे दोघे बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी निवड झालेल्या गणेश देशमुख यांना ८१७, उपाध्यक्षपदाचे गोविंद सूर्यवंशी यांना ८१६ आणि दुसरे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांना ८३१, सरचिटणीस सुनील म्हामुणकर यांना ९२१, कार्यचिटणीस विजय बाम्हणे ८९७, चिटणीस विलास निकम ९०२ आणि खजिनदारपदी निवड झालेल्या मनोहर जांगळे यांना ७९८ मते मिळाली. विश्वास टिकवला : टीएमटीसमोर अडचणीचा डोंगर आहे. सेवा पंक्चर झाल्याची टीका सुरू आहे. कामगारांचेही प्रश्न सोडवण्याची गरज आहे. या स्थितीत टीएमटी शिवसेनेच्या हातातून जाईल, असा विरोधकांचा दावा होता. पण या स्थितीतही कामगारांचा विश्वास कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना