शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

उल्हासनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा थकला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने पगार झाला नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात असले, तरी अभय योजनेचे पैसे गेले कुठे, असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत.

उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली असून, सरासरी दीड कोटीची वसुली दररोज होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याची १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. घराचे भाडे, गृहकर्जाचे हप्ते, शिक्षण खर्च व इतर देणी देऊन घर कसे चालवावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना आता गप्प का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या धनादेशावर सही केल्यानंतरही, पगार कसा झाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी शासनाकडून मिळणारे जीएसटीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर झाल्याचे सांगितले. मात्र, अभय योजनेद्वारे एका महिन्याला २० कोटींची वसुली झाली. ती रक्कम नेमकी गेली कुठे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

महापालिकेचा दरमहा आस्थापनाचा खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी पगारावर १२ कोटी रुपये खर्च होतात. महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. अभय योजनेंतर्गत वसुली झालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का दिले नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पगार उशिराने होत असल्याने, त्यांना पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज देण्याची मागणी करणार असल्याचे टाक यांनी सांगितले.

...........

चौकट

ठेकेदारांच्या बिलास दिले प्राधान्य

महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतून २० कोटींची वसुली झाली. त्या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांचा पगार देणे गरजेचे होते. मात्र, त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी दिल्यानेच कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.

.......