शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उल्हासनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा थकला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतरही महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने पगार झाला नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात असले, तरी अभय योजनेचे पैसे गेले कुठे, असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत.

उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली असून, सरासरी दीड कोटीची वसुली दररोज होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याची १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. घराचे भाडे, गृहकर्जाचे हप्ते, शिक्षण खर्च व इतर देणी देऊन घर कसे चालवावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना आता गप्प का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या धनादेशावर सही केल्यानंतरही, पगार कसा झाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी शासनाकडून मिळणारे जीएसटीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर झाल्याचे सांगितले. मात्र, अभय योजनेद्वारे एका महिन्याला २० कोटींची वसुली झाली. ती रक्कम नेमकी गेली कुठे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

महापालिकेचा दरमहा आस्थापनाचा खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी पगारावर १२ कोटी रुपये खर्च होतात. महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. अभय योजनेंतर्गत वसुली झालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का दिले नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पगार उशिराने होत असल्याने, त्यांना पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज देण्याची मागणी करणार असल्याचे टाक यांनी सांगितले.

...........

चौकट

ठेकेदारांच्या बिलास दिले प्राधान्य

महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतून २० कोटींची वसुली झाली. त्या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांचा पगार देणे गरजेचे होते. मात्र, त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी दिल्यानेच कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.

.......