शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

पालिका शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: February 10, 2017 04:01 IST

महापालिका शिक्षकांना दोन महिन्यांंपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी अनुदान आले नसल्याने पगार दिला नसल्याची

सदानंद नाईक , उल्हासनगरमहापालिका शिक्षकांना दोन महिन्यांंपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी अनुदान आले नसल्याने पगार दिला नसल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, कंत्राटदारांची बिले वेळेत दिली जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. पालिका शिक्षण मंडळाचे ३० कोटींपेक्षा अधिक अंदाजपत्रक आहे. विविध माध्यमांच्या २८ शाळा असून त्यात ७ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, १७९ शिक्षक आहेत. शिक्षकांच्या पगारासाठी राज्य सरकार व पालिका अर्धा भार उचलते. मात्र, तीन महिन्यांपासून सरकारचे अनुदान आले नसल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांनी दिली. त्यामुळेच शिक्षकांचे पगार दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकाराने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. राज्य सरकारच्या अनुदानाला विलंब झाला, तरी शिक्षण मंडळाच्या निधीतून शिक्षकांचे पगार यापूर्वी दिले जात होते. पालिका शाळांसाठी सुरक्षारक्षक नसल्याने पटांगणात रात्री पार्ट्या होतात, असे शिक्षकांनी सांगितले. तसेच बहुतांश शाळा मुख्याध्यापकांविना आहेत. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मात्र शिक्षण मंडळावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. अन्यथा यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होऊ शकतो.