शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

ठामपा अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

By admin | Updated: May 3, 2017 05:51 IST

प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची

ठाणे : प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची थाप द्यायची आणि महासभेत मात्र शेलक्या शब्दांत उद्धार करायचा यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य अधिकारी विलक्षण नाराज झाले आहेत. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत यातील अनेक अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला, तर खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल हेही व्यथित झाल्याने काही काळ वातावरण तापले होते. ठाण्याच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडणार आहे. त्यामुळे नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यामुळे ठाणे पालिकेचा गाडा पुन्हा रूतून बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यावर कसा मार्ग काढता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात मूळ मुद्दयावर चर्चा करताकरता अनेक अधिकाऱ्यांनी महासभेत झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला. उत्पन्न वाढवण्यासाठी नगरसेवक करवाढ करू देत नाहीत, थकबाकी वसूल करायची ठरवली तर ती रोखतात, दबाव आणतात, अशा स्थितीत कामे करायची कशी हा त्यांचा प्रश्न होता. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल तर आम्ही राजीमाना देतो. अशी नोकरीच करायला नको, अशा तीव्र शब्दांत त्यांनी भावना मांडल्या. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनासोबत खास करून आयुक्तांसोबत शिवसेनेचे शीतयुद्ध सुरू झाल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांत संघर्ष उभा ठाकला आहे. यापूर्वी केलेल्या कामांनाही पक्षीय लेबल लावले जात असल्याने अधिकारी अस्वस्थ आहेत. सततच्या कोंडीमुळे आयुक्त संजीव जयस्वाल सर्वाधिक व्यथित आहेत. ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. रस्ता रु ंदीकरणामुळे सर्वांनीच पाठीवर कौतुकाची थाप मारली. डबघाईला आलेल्या पालिकेच्या तिजोरीत घसघशीत उत्पन्नाची वाढ केली. त्यानंतरही जर नगरसेवक अशी टीका करणार असतील; तर काम तरी कशासाठी करायचे, असा निरवानिरवीचा सूर आयÞुक्तांनी बैठकीत लावल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे बैठकीतील वातावरणच बदलले. अनेक अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. अखेर काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईचा सूर लावला आणि समजूत काढली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कानावर ही नाराजी घालायची आणि या भावना पोचवायच्या असे ठरल्याचे समजते. मात्र एकही अधिकारी रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृतपणे बोलण्यास तयार नव्हता.अधिकाऱ्यांच्या या राजीनाम्याच्या पवित्र्यातून शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याची चर्चा नंतर पालिका वर्तुळात रंगली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांनी खाजगीत बोलताना अधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यातून आयुक्तांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे असलेले संबंध याला कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला. यातून भाजपा वेगळ््या मार्गाने शिवसेनेवर दबाव आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजीठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबद्दल गौरवोद््गार काढले होते. मी ठरवून ्शा अधिकाऱ्याला ठाण्यात पाठवल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण जयस्वाल यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने त्यांनी मध्यरात्री मला फोन करून कुटुंबाबाबत चिंता वाटत असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्र्यांचा रोख शिवसेनेवर असल्याने त्या पक्षाचे नेते संतापले. भाजपासोबत राजकीय वाद होता. पण आयुक्तांचा शिवसेनेसोबत राजकीय वापर झाल्याने त्यांचे आयुक्तांसोबतचे संबंध बिघडले. निकालानंतर जयस्वाल यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. पण शिवसेनेसोबतचे त्यांचे संबंध सुधारले नाहीत. उलट रस्ता रूंदीकरणाच्या मुद्द्यावर त्यांचा महापौरांशी संघर्ष झाला. पुढे करवाढ पूर्णपणे फेटाळून शिवसेनेने त्यांच्यावरील रागाचे उट्टे काढल्याची चर्चा रंगली. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या आयुक्तांनी निरवानिरवीची भाषा केल्याचे सांगितले जाते.