शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

By admin | Updated: May 3, 2017 05:51 IST

प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची

ठाणे : प्रसंगी धोका पत्करून, धमक्यांना भीक न घालता विकासकामे करायची; नेत्यांनी त्याचे राजकीय श्रेय घ्यायचे, एकीकडे कौतुकाची थाप द्यायची आणि महासभेत मात्र शेलक्या शब्दांत उद्धार करायचा यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि अन्य अधिकारी विलक्षण नाराज झाले आहेत. पालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत यातील अनेक अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला, तर खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल हेही व्यथित झाल्याने काही काळ वातावरण तापले होते. ठाण्याच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडणार आहे. त्यामुळे नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यामुळे ठाणे पालिकेचा गाडा पुन्हा रूतून बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यावर कसा मार्ग काढता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात मूळ मुद्दयावर चर्चा करताकरता अनेक अधिकाऱ्यांनी महासभेत झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला. उत्पन्न वाढवण्यासाठी नगरसेवक करवाढ करू देत नाहीत, थकबाकी वसूल करायची ठरवली तर ती रोखतात, दबाव आणतात, अशा स्थितीत कामे करायची कशी हा त्यांचा प्रश्न होता. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल तर आम्ही राजीमाना देतो. अशी नोकरीच करायला नको, अशा तीव्र शब्दांत त्यांनी भावना मांडल्या. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनासोबत खास करून आयुक्तांसोबत शिवसेनेचे शीतयुद्ध सुरू झाल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांत संघर्ष उभा ठाकला आहे. यापूर्वी केलेल्या कामांनाही पक्षीय लेबल लावले जात असल्याने अधिकारी अस्वस्थ आहेत. सततच्या कोंडीमुळे आयुक्त संजीव जयस्वाल सर्वाधिक व्यथित आहेत. ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. रस्ता रु ंदीकरणामुळे सर्वांनीच पाठीवर कौतुकाची थाप मारली. डबघाईला आलेल्या पालिकेच्या तिजोरीत घसघशीत उत्पन्नाची वाढ केली. त्यानंतरही जर नगरसेवक अशी टीका करणार असतील; तर काम तरी कशासाठी करायचे, असा निरवानिरवीचा सूर आयÞुक्तांनी बैठकीत लावल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे बैठकीतील वातावरणच बदलले. अनेक अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. अखेर काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईचा सूर लावला आणि समजूत काढली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कानावर ही नाराजी घालायची आणि या भावना पोचवायच्या असे ठरल्याचे समजते. मात्र एकही अधिकारी रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृतपणे बोलण्यास तयार नव्हता.अधिकाऱ्यांच्या या राजीनाम्याच्या पवित्र्यातून शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याची चर्चा नंतर पालिका वर्तुळात रंगली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांनी खाजगीत बोलताना अधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याच्या पवित्र्यातून आयुक्तांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे असलेले संबंध याला कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला. यातून भाजपा वेगळ््या मार्गाने शिवसेनेवर दबाव आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजीठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबद्दल गौरवोद््गार काढले होते. मी ठरवून ्शा अधिकाऱ्याला ठाण्यात पाठवल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण जयस्वाल यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने त्यांनी मध्यरात्री मला फोन करून कुटुंबाबाबत चिंता वाटत असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्र्यांचा रोख शिवसेनेवर असल्याने त्या पक्षाचे नेते संतापले. भाजपासोबत राजकीय वाद होता. पण आयुक्तांचा शिवसेनेसोबत राजकीय वापर झाल्याने त्यांचे आयुक्तांसोबतचे संबंध बिघडले. निकालानंतर जयस्वाल यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. पण शिवसेनेसोबतचे त्यांचे संबंध सुधारले नाहीत. उलट रस्ता रूंदीकरणाच्या मुद्द्यावर त्यांचा महापौरांशी संघर्ष झाला. पुढे करवाढ पूर्णपणे फेटाळून शिवसेनेने त्यांच्यावरील रागाचे उट्टे काढल्याची चर्चा रंगली. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या आयुक्तांनी निरवानिरवीची भाषा केल्याचे सांगितले जाते.