शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

वसईत बाटलीबंद पाण्याच्या गोरखधंद्याला जोर

By admin | Updated: June 3, 2017 06:07 IST

वसई तालुक्यातील शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. पाणी शुध्दीकरण करणाऱ्या प्रकल्पामध्ये

सुनिल घरत/ लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्यातील शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. पाणी शुध्दीकरण करणाऱ्या प्रकल्पामध्ये फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळा नसल्याने तसेच शुद्धतेचे कोणतेही निकष तपासले जात नसल्याने मोठ्या रक्कमा आकारुन नागरिकांना अशुद्ध पाणी पाजले जात आहे.तालुक्यात कामण, सातीवली, धानीव, पेल्हार बावखळ, शिरसाड आदि ठिकाणी बाटलीबंद पाण्याचे कारखाने सक्रीय असून या कारखान्यात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. पाणी शुध्दतेसाठी १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या घेण्याचे नियम कारखान्याचे मालक पायदळी तुडवत आहेत. या बाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पाणी प्रक्रिया उद्योगाकडे पाठ फिरवत असल्याने त्याला चांगलाच जोर चढला आहे. पाणी परीक्षणाचे निकष धाब्यावर : पाणी पिण्यायोग्य होण्यााठी ३२ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डीसल आॅक्सिजन हार्डलेस पी एच, ओडर, कलर, जिवाणुंची स्थिती, पाण्यातील जडपणा अशा प्रकारच्या चाचण्या पाणी प्रकल्पात करणे गरजेचे आहे. या प्रयोग शाळांमध्ये तंत्रज्ञ असणेही गरजेचे आहे. पाण्याती क्षार, विषाणू क्लोराईडसह, घातक द्रव्य बाजुला काढण्याचे तसेच स्वच्छता, पॅकिंग या संदर्भातील निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात नाहीत. हे करतांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग चांगल्या दर्जाची करण्यात येत असून ग्राहक ही या आकर्षक पॅकिंगला भुलून हे बाटलीबंद पाणी विकत घेत आहेत. काही ठिकाणी तर बोअरवेल, नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून घरीच पॅकिंग करून विकण्यात येत आहे. शासना कडून नागरिकांच्या होणाऱ्या या लुटीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची व्यथा वसई स्थानकातील अनेक तरुणांनी केली आहे. नोकरी, व्यावसाया निमित्त निघलेल्या अनेकांना या पाठीमागे लागायला वेळ नसतो. तसेच केल्याल्या तक्रारीची पुढे फॉलोअप होत नसल्याचेही अनेकांनी सांगितले.बाटलीबंद अशुध्द पाणी विकणे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असून पाणी प्रकल्पात ५ रूपयांना मिळणारी १ लीटर पाण्याची बाटली दुकानात २० रूपयांना मिळत असल्याने पाण्याची शुध्दता तपासून विक्री किमतीवरही सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- राम पाटील, सदस्य,ग्राहक संरक्षण परिषद पालघर जिल्हा