शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

वसईत बाटलीबंद पाण्याच्या गोरखधंद्याला जोर

By admin | Updated: June 3, 2017 06:07 IST

वसई तालुक्यातील शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. पाणी शुध्दीकरण करणाऱ्या प्रकल्पामध्ये

सुनिल घरत/ लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्यातील शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. पाणी शुध्दीकरण करणाऱ्या प्रकल्पामध्ये फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळा नसल्याने तसेच शुद्धतेचे कोणतेही निकष तपासले जात नसल्याने मोठ्या रक्कमा आकारुन नागरिकांना अशुद्ध पाणी पाजले जात आहे.तालुक्यात कामण, सातीवली, धानीव, पेल्हार बावखळ, शिरसाड आदि ठिकाणी बाटलीबंद पाण्याचे कारखाने सक्रीय असून या कारखान्यात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. पाणी शुध्दतेसाठी १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या घेण्याचे नियम कारखान्याचे मालक पायदळी तुडवत आहेत. या बाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पाणी प्रक्रिया उद्योगाकडे पाठ फिरवत असल्याने त्याला चांगलाच जोर चढला आहे. पाणी परीक्षणाचे निकष धाब्यावर : पाणी पिण्यायोग्य होण्यााठी ३२ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डीसल आॅक्सिजन हार्डलेस पी एच, ओडर, कलर, जिवाणुंची स्थिती, पाण्यातील जडपणा अशा प्रकारच्या चाचण्या पाणी प्रकल्पात करणे गरजेचे आहे. या प्रयोग शाळांमध्ये तंत्रज्ञ असणेही गरजेचे आहे. पाण्याती क्षार, विषाणू क्लोराईडसह, घातक द्रव्य बाजुला काढण्याचे तसेच स्वच्छता, पॅकिंग या संदर्भातील निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात नाहीत. हे करतांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग चांगल्या दर्जाची करण्यात येत असून ग्राहक ही या आकर्षक पॅकिंगला भुलून हे बाटलीबंद पाणी विकत घेत आहेत. काही ठिकाणी तर बोअरवेल, नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून घरीच पॅकिंग करून विकण्यात येत आहे. शासना कडून नागरिकांच्या होणाऱ्या या लुटीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची व्यथा वसई स्थानकातील अनेक तरुणांनी केली आहे. नोकरी, व्यावसाया निमित्त निघलेल्या अनेकांना या पाठीमागे लागायला वेळ नसतो. तसेच केल्याल्या तक्रारीची पुढे फॉलोअप होत नसल्याचेही अनेकांनी सांगितले.बाटलीबंद अशुध्द पाणी विकणे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असून पाणी प्रकल्पात ५ रूपयांना मिळणारी १ लीटर पाण्याची बाटली दुकानात २० रूपयांना मिळत असल्याने पाण्याची शुध्दता तपासून विक्री किमतीवरही सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- राम पाटील, सदस्य,ग्राहक संरक्षण परिषद पालघर जिल्हा