शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाण्याचा पंपाचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: April 4, 2024 16:06 IST

जांभूळच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रात घडला अपघात

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये जमिनीत पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. 

अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ठेकेदाराने कामात दुर्लक्ष पणा केल्यामुळे तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. पंप बंद असला तरी पंपाला असलेला विजेचा पुरवठा सुरूच ठेवल्याने या पंपाला शॉक लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. मृत कामगारांमध्ये शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल(१९) यांचा समावेश आहे.

- बारवी नदीतून पाणी उचलून ते पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवठा करण्यासाठी नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.

- जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

- जलशुद्धीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरवली न गेल्यामुळेच त्यांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ