शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पाण्याचा पंपाचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: April 4, 2024 16:06 IST

जांभूळच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रात घडला अपघात

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये जमिनीत पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. 

अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ठेकेदाराने कामात दुर्लक्ष पणा केल्यामुळे तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. पंप बंद असला तरी पंपाला असलेला विजेचा पुरवठा सुरूच ठेवल्याने या पंपाला शॉक लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. मृत कामगारांमध्ये शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल(१९) यांचा समावेश आहे.

- बारवी नदीतून पाणी उचलून ते पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवठा करण्यासाठी नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.

- जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

- जलशुद्धीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरवली न गेल्यामुळेच त्यांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ