शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

येऊरच्या जंगलात आढळले तीन बिबटे !

By admin | Updated: May 23, 2016 02:36 IST

तीव्र उन्हाळ्यात पाणवठ्यावर येणारे वन्य प्राणी, पशुपक्षी यांची येऊरच्या जंगलात दोन दिवस ‘पाणवठा गणना’ करण्यात आली

ठाणे : तीव्र उन्हाळ्यात पाणवठ्यावर येणारे वन्य प्राणी, पशुपक्षी यांची येऊरच्या जंगलात दोन दिवस ‘पाणवठा गणना’ करण्यात आली असता तीन बिबट्यांसह १६ प्रकारचे पशुपक्षी मुक्त संचार करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे. येऊरचे वन अधिकारी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस ‘पाणवठा वन्यजीव गणना’ करण्यात आली. यासाठी जंगलातील ठिकठिकाणच्या पाणवठ्यांवर सुमारे ३० स्वयंसेवकांनी लक्ष ठेवले होते. त्यामध्ये तीन बिबटे, ९२ माकडे, ६४ वानर आदींसह मुंगूस, वाटवाघूळ, रानडुकरे, रानमांजर, चितळ, ससा, सांबर, भेकर, घुबड, रानकोंबड्या, सर्प, गरूड, घोरपड व नाग आढळले आहेत. येऊरच्या या निसर्गरम्य जंगलात २५० पशुपक्षी आहेत, असे या गणनेच्या निमित्ताने आढळून आले. नोंद घेतलेल्या या पक्ष्यांमध्ये श्रीलंकन फ्रॉग माऊथ या नवीन पक्ष्याचा वावर येऊरमध्ये आढळून आला. याशिवाय, मलबार व्हिस्टलिंग थ्रुश, इंडियन हॉर्नबिल, किंगफिशर, ब्राऊन हेडेड बारबेट, लाँग टेलेड ड्रोंगो, इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचेर आणि स्पॉटेड बाबलेर आदींची नोंद झाली. येऊर येथे बांधलेली संरक्षक भिंत ही प्राण्यांसह पक्ष्यांनाही लाभदायक ठरली आहे. यामुळे जंगलात शिरकाव करणाऱ्या लोकांचे लोंढे कमी झाले असून प्राणी, पशुपक्षी मुक्तपणे जंगलात फिरत आहेत. ही गणना मनासारखी करताना मोठा आनंद मिळाल्याचा अनुभव प्राणिमित्र नितेश पांचोळी यांनी सांगितला. (प्रतिनिधी)