शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने तीन प्रवासी जखमी, मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अडीच तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:26 IST

कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

अंबरनाथ : कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती. परिणामी, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.कर्जतहून निघालेली ही जलद लोकल अंबरनाथ स्थानकातील फलाट क्रमांक-३ वर दुपारी २.५६ वाजता आली. अचानक या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून तुटला. लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या कमलेश जादवानी यांना त्याचा फटका बसला व ते जखमी झाले. अन्य एक प्रवासी विनय बेडेकर हेही जखमी झाले. त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सचिन घाग या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.या घटनेनंतर मुंबईकडील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. एकामागोमाग एक लोकल उभ्या होत्या. पेंटाग्राफच्या दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने कल्याणहून इंजीन मागवून ही लोकल फलाट क्र.-३ वरून हलवण्यात आली. त्यानंतर, ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम करून रेल्वेसेवा पूर्ववत झाली. अडीच तास एकही लोकल कर्जत मार्गावरून मुंबईकडे न गेल्याने अंबरनाथ, बदलापूर स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांनी लोकल सुरू होण्याची वाट न पाहता थेट कल्याण गाठले आणि तेथून मुंबईच्या दिशेने प्रवास केला.पावसाने मध्य रेल्वे खोळंबलीमुंबई : दीर्घ कालीन विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली. शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शनिवारी सकाळी उपनगरांत जोर धरला. यामुळे भांडूप, कांजूर मार्ग स्थानकांजवळील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. परिणामी सकाळच्या सत्रातील मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरु होती.साधारण महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबई उपनगरात दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाचे पुनरागमन होताच मध्य रेल्वेचा वेग मंदावला. भांडूप, कांजूर मार्ग, विक्रोळी स्थानकाजवळील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने मरेच्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. लोकल उशिराने सुरु असल्यामुळे ठाणे, मुलूंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला स्थानकांमध्ये प्रवासी गर्दी वाढली. सकाळच्या सत्रातील बहुतांशी लोकल लेटमार्कसह धावत होत्या. याचा परिणाम दुपारच्या सत्रातील लोकल सेवांवर देखील दिसून आला.रुळावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित स्थानकांतील पाण्याचे पंप स्थानक प्रशासनाकडून तात्काळ कार्यान्वित करण्यात आले. परिणामी मुसळधार पावसाच्या आगमनाने लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध स्थानकांवर उद्घोषणेद्वारे याबाबत माहिती देण्यात येत होती.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे