शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

तीन महिन्यांसाठी एसटी पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: January 5, 2017 05:34 IST

१ जानेवारीपासून शहरी बस वाहतूक बंद पडल्याने नोकरदार, बागायतदार आणि विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा डेपोत

शशी करपे, वसई१ जानेवारीपासून शहरी बस वाहतूक बंद पडल्याने नोकरदार, बागायतदार आणि विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा डेपोत धरणे आंदोलन करीत एसटी वाहतूक बंद पाडली होती. या आंदोलनाच्या दणक्याने परिवहन विभागाने ३१ मार्चपर्यंत शहरी बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेत बसेस सुरु केल्या. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केला. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याठिकाणी एसटी बस वाहतूक बंद करून महापालिकेची परिवहन सेवा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार वसई विरार पालिकेने २०१२ रोजी परिवहन सेवा सुरु केल्यानंतर एसटीने ४८ मार्गावर बस सुरु करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेने ३४ मार्गावर बससेवा सुरु केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने उर्वरित १४ मार्गावर तोटा सहन करीत बस वाहतूक सुरु ठेवली होती. सप्टेंबर महिन्यात एसटीने वसई आणि नालासोपारा डेपोतून सुटणाऱ्या शहरी बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापालिकेने बसेसची कमतरता आणि जागेची अडचण पुढे करीत बस सेवा सुरु करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. महापालिका बस सुुरु करण्यास टाळाटाळ करीत होती. तर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर २५ मार्गावरील बस वाहतूक बंद करण्याचे आदेश आले होते. त्यामुळे पालघर विभाग नियंत्रकांनी १ जानेवारीपासून बस सेवा बंद केली होती. सध्या दहावीच्या प्रिलीम परिक्षा सुरु आहेत. त्यांच्यासोबत ग्रामीण भागातून सकाळी मुंबईच्या बाजारात भाजीपाला आणि फुले घेऊन जाणारे बागायतदार आणि नोकरदार यांचे हाल सुरु झाले होते. एसटी बंद पडल्याने रिक्षा चालकांनी अडवणूक करीत चारपट दर आकारणी सुरु केली होती. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा एसटी डेपोसमोर धरणे आंदोलन करून एसटी वाहतूक बंद पाडली होती. जनआंदोलन समितीच्या डॉमणिका डाबरे, भाजपाचे राजन नाईक, काँग्रेसचे विजय पाटील, बहुजन विकास आघाडीचे सभापती पंकज चोरघे, नगरसेवक अजित नाईक, नगरसेवक मार्शल लोपीस, नगरसेविका रंजना थालेकर, नगरसेविका सुषमा लोपीस, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष भरत पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शेकडो गावकरी उत्फ्सूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे एसटी वाहतूक ठप्प होऊन वातावरण तणावग्रस्त झाले होते. दरम्यान, आंदोलन सुुरु असताना भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक आणि उपाध्यक्ष मनोज पाटील मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाशी सतत संपर्क साधून तोय्ऋगा काढण्याचा प्रयत्न करीत होते. तर शिक्षक आमदार कपिल यांनी वसईतून मुंबईला मोठ्या प्रंमाणावर जाणाऱ्या शिक्षकांची गैरसोय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून देऊन शिष्टाई केली होती.