शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चार महिन्यांत तीन कोटींचा दंड वसूल

By admin | Updated: September 5, 2015 02:58 IST

राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना तिच्याकडे कानाडोळा करून राजरोस बेलगामपणे बेफाम वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत

पंकज रोडेकर, ठाणे राज्यात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यास बंदी असताना तिच्याकडे कानाडोळा करून राजरोस बेलगामपणे बेफाम वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) कारवाई सुरू आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि आच्छाड या विभागांत मागील चार महिन्यांत तीन हजार ७३८ वाहनांवर कारवाई करून तीन कोटींचा तडजोडीअंती दंड वसूल केल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली. चालू वर्षातील चार महिन्यांत एकूण २२ हजार ८५३ वाहने तपासली असून त्यामधील तीन हजार ७३८ वाहने दोषी आढळली आहेत, तर तीन हजार ७७४ प्रकरणे निकाली काढून त्यांच्याकडून तडजोड करून तीन कोटी १८ लाख २९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आच्छाड येथून ६७ लाख ६ हजार वसुलीदोन हजार ५८४ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये आच्छाड येथे सर्वाधिक दोषी आणि जप्त केलेल्या वाहनचालक-मालकांकडून ६७ लाख ६ हजारांचा दंड वसूल केला आहे. त्यापाठोपाठ ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई तसेच वसई विभागात कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आच्छाड येथे दोषी ठरवलेली सर्वच वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.१ ते ३१ आॅगस्टदरम्यान ठाणे शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या वेळी शहरातील विविध मुख्य नाक्यांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा पथके तैनात होती. त्यांनी २६४ वाहने दोषी ठरवून ८० वाहने जप्त केली आहेत. तर, ३४ लाख २७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे.असा आकारला जातो दंडमोटार वाहतूक कायद्यात दंड शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार, कारवाई केली जाते. पहिल्या टनाला अडीच हजार रुपये असून त्यापुढील टनाला प्रति हजार रुपये वाढ होते.किती मालवाहतूक करता येतेमालवाहतूक करणाऱ्या ६ चाकी वाहनांना ९ ते १० टन तसेच १० चाकी वाहनांना जवळपास १५ ते १६ टन वाहतूक करण्याची परवानगी आहे.