शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुलीला पळवणारी माता तीन वर्षांनंतर अटक

By admin | Updated: April 26, 2017 23:55 IST

न्यायालयाच्या आदेशाने मुलीचा ताबा पतीला मिळाला, तरीही त्या मुलीला घेऊन तीन वर्षांपूर्वी पळालेल्या मुंब्रा येथील एका मातेला ठाणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.

ठाणे : न्यायालयाच्या आदेशाने मुलीचा ताबा पतीला मिळाला, तरीही त्या मुलीला घेऊन तीन वर्षांपूर्वी पळालेल्या मुंब्रा येथील एका मातेला ठाणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.मुंब्रा येथील अब्बास अली अकबर अली या भारतीय नागरिकत्व मिळालेल्या इराणी नागरिकाने ११ नोव्हेंबर २०१० रोजी नजमासोबत (बदललेले नाव) विवाह केला. मूलबाळ होत नसल्याने त्यांनी टेस्टट्यूब बेबी उपचारपद्धतीचा अवलंब केला. २५ जानेवारी २०१३ रोजी त्यांना मुलगी झाली. सकिनाच्या जन्मानंतर पतीपत्नीमध्ये वाद होऊ लागले. नजमा तिच्या पतीकडे नेहमी पैशांची मागणी करायची. तिची मागणी अब्बास अलीने वेळोवेळी पूर्ण केली. पतीपत्नीमधील वाद अखेर कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने मुलीचा कायमस्वरूपी ताबा अब्बास अली यांना दिला. १३ आॅगस्ट २०१४ रोजी नजमा मुलीला घेऊन नातेवाइकांकडे गेली. ६ डिसेंबर २०१४ रोजी अब्बास अलीने पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुंब्रा पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी या मायलेकीचा शोध घेतला. परंतु, बरेच प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे अब्बास अली यांनी २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. तरीही यश न मिळाल्याने अब्बास अली यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी नजमाविरुद्ध ८ आॅक्टोबर २०१६ रोजी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अखेर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेची मदत मागितली. (प्रतिनिधी)