शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी तीन तासांची रखडपट्टी

By admin | Updated: April 30, 2017 04:22 IST

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय एका आदिवासी महिलेला आला आहे. गंभीर दुखापत झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याचे सरकारी आदेश

- मुरलीधर भवार, कल्याण

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय एका आदिवासी महिलेला आला आहे. गंभीर दुखापत झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याचे सरकारी आदेश असताना सायन रुग्णालयात तिला उपचाराविना तिष्ठीत ठेवले. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्याने रुग्णालय प्रशासनाला सरकारी आदेशाची जाणीव करून देताच तिच्यावर तीन तासांनंतर उपचार करण्यात आले.शहापूर तालुक्यातील रास गावातील सुमन मुकणे ही भाजीपाला विकून उदरनिर्वाह करते. ती तिच्या दोन लहान मुलांसह शुक्रवारी दुपारी आंबिवली परिसरात भाजीविक्रीसाठी निघाली होती. आंबिवली स्थानकात ती दीड वाजता उतरताच अचानक फलाटावर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस परमेश्वर खरात यांनी तिला केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. सुमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेथील डॉक्टरने तिला सायन रुग्णालयात हलवण्याची सूचना केली. खरात यांनी तिला सायन नेले. तेथील डॉक्टरांनी सिटी स्कॅनसाठी १२०० रुपये शुल्क भरण्यास सांगितले. तेवढे पैसे खरात यांच्याकडे नसल्याने त्यांनी त्यास आक्षेप घेतला. गंभीर दुखापत झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार करणे आवश्यक असताना पैशासाठी अडवणूक करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सुमनच्या वारसांना बोलावून घ्या, असे सांगितले. या सगळ््या प्रकारात सुमनला तीन तास उपचार मिळाले नाहीत.सरकारी रुग्णालयातील ही वागणूक पाहून खरात यांनी सामाजिक कार्यकर्ते समीर जव्हेरी यांच्याशी साधला. जव्हेरी यांनी रुग्णालयाच्या डीनशी तातडीने संपर्क साधून सरकारने २०११ मध्ये काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली. त्यानंतर सुमनवर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, सुमन कशामुळे पडली, तिला दुखापत कशी झाली, हे समजू शकलेले नाही. उष्माघातामुळे तिला चक्कर आली असावी, असा अंदाज आहे. पोलीसही नेहमीच टिकेचा विषय ठरतात. खरात यांनी त्याला छेद देत खाकी वर्दीतील माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.सुमनची मुले ‘जननी आशीष’मध्ये- सुमनच्या मुलांना रुग्णालयात नेणे शक्य नसल्याने खरात यांनी तिच्या दोन्ही मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशीष’ या निराधार मुलांच्या आश्रमात सोडले आहे. - सुमन बरी झाल्यावर तिच्याकडे तिची मुले सोपवली जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते जव्हेरी यांनी या प्रकरणाची तक्रार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.